खटाव:-प्रभाकर घार्गे यांनी अर्धे मैदान मारले, बंडखोरी रोखण्यात यश मिळवले तर आता 21 उमेदवार रिंगणात.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
प्रभाकर घार्गे यांनी अर्धे मैदान मारले, बंडखोरी रोखण्यात यश मिळवले तर आता 21 उमेदवार रिंगणात.
मायणी प्रतिनिधी—माण. मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्यापुढे शेतकरी संघटनेचे अनिल पवार, राष्ट्रवादीचेच नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप साळुंखे यांच्या बंडखोरीने आव्हान निर्माण झाले होते परंतु प्रभाकर घार्गे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्याने तीन बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे प्रभाकर घारगे . यांनी अर्धी लढाई जिंकली आहे राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलाहामुळे मान मतदार संघ राज्यभर गाजत होता अनिल देसाई प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप यांच्या मागणीमुळे तिकीट कोणाला द्यायची हा प्रश्न वरिष्ठांना पडला होता शेवटी रामराजे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे प्रभाकर घार्गे यांचे नाव पुढे आले सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून असलेल्या जयकुमार गोरे यांनी या फुटीचा फायदा घेण्याचे ठरवले होते. शेवटी प्रभाकर घार्गे यांच्या नावाला मान्यता मिळाली. व मार्ग सुकर झाला असले असे वाटत असले तरी नंदकुमार मोरे संदीप साळुंखे, अनिल पवार, आमचे अर्ज ठेवल्याने राष्ट्रवादीच्या मतदानाची विभाजन होऊन गुंडगिरी पुन्हा उफाळून येईल. वरील याची जाणीव या उमेदवाराला झाल्याने व वरिष्ठांनी मनधरणी केल्याने त्यांनी आपले अर्ज काढून घेतले पुतण्यासह लेकीची भिरकिट— सर्वच मतदारसंघातीलौ कार्यकर्त्यांना भेटण्यात प्रभाकर घार्गे यांना अडचणी येत होत्या त्याची उणीव पुतण्या महेश घार्गे व कन्या प्रीती घार्गे यांनी गावना गाव घर नगर पिंजून काढल्याने प्रभाकर घार्गे यांची सुरुवात चांगली झाली आहे.