खटाव:-मायणी परिसरात संततधार पावसाने दोन्ही हंगाम वाया जाण्याची भीती.
ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
मायणी परिसरात संततधार पावसाने दोन्ही हंगाम वाया जाण्याची भीती.
मायणी प्रतिनिधी_यावर्षी मायणी परिसरात संततधार पावसामुळे खरीप हंगाम वाया गेलाच परंतु आता या आंधळीच्या नक्षत्रात संततधार पावसामुळे रब्बी हंगाम देखील वाया जाणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की यंदा उन्हाळा अतिशय कडक असल्याने पावसाळा देखील तसाच सुरू झाला रब्बी हंगामात संतत धार पावसामुळे शेतकऱ्याला पेरणी करता आली नाही कारण शेतात उपसाही आला नाही आता सध्या आंधळी नक्षत्र असल्याने या नक्षत्रात रात्रीचा पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेतात पेर करता येत नाही या हंगामात गहू ,ज्वारी ., करडई, मका ही अन्नधान्याची पिके घेतली जातात जर पाऊस असाच सुरू राहिला तर हा हंगाम वाया जाण्याची भीती आहे. तसेच यंदा सरकारने 15 नोव्हेंबर पासून सारखा साखर कारखाने सुरू करण्याचा आदेश दिल्याने असलेला ऊस सांभाळणे ही अवघड झाली आहे जर दोन्ही हंगाम वाया गेले तर ओला दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली आहे.