फलटण:-वाचन संस्कृती वाढविण्यात स्त्रियांचे मोठे योगदान – जयश्री तांबे.
पत्रकार आशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आशितोष चव्हाण
RPS STAR NEWS
वाचन संस्कृती वाढविण्यात स्त्रियांचे मोठे योगदान – जयश्री तांबे.
नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीची उपासना, नवरात्र म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत शक्तीचा जागर असतो. खरंतर स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे.तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्णत्वास नेण्याची ताकत तिच्यामध्ये आहे. जग बदलण्याची क्षमता तिच्यात आहे.तीच जन्मदाता आहे, तिनेच सृष्टी रचली आहे. स्त्रीला तिच्यातल्या अस्तित्वाची जाणीव असणे हे खूप महत्त्वाचे आहे. ही जाणीव देवी दुर्गेच्या नवरूपा मधून स्त्रियांना होत असते.
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक दिवशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यावर्षीही नवरात्र उत्सवा मध्ये पुढील नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कु.अनुष्का भरत केंजळे, कु.ऋतुजा गणेश तरटे, मनीषा शंकर रामगुडे , ॲड.लाडूबाई हणमंत शेंडगे/ कोकरे, प्रतिभा शिवाजी भारती/ गोसावी, डॉ.शिवानी उदयकुमार नाळे, सारिका संतोष पाटणे, जस्मिन दस्तगीर मुल्ला, सविता गोविंद केंबुळकर /जाधव इ.विविध क्षेत्रातील महिलांचा नवरात्रीमध्ये नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना भारतातील सशक्त पिढी घडवण्याचे काम करण्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे योगदान खूप मोठे आहे. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना तारेवरची कसरत करावी लागत असते.घर, कुटुंब, मुलांचा सांभाळ, नातेवाईक ,शेती, नोकरी इत्यादी अनेक गोष्टीचा समतोल राखण्याचं काम महिलांना करावे लागते.
नवरात्र उत्सव निमित्त समाजातील विविध घटकांना एकच मागणी आहे की , आपण सर्वांनी मुलींचा व स्त्रियांचा आदर केला पाहिजे.असे मत आई प्रतिष्ठानच्या सचिव सौ.जयश्री गणेश तांबे यांनी व्यक्त केले. तसेच या नवरात्रीतील नवदुर्गा पुरस्कार प्राप्त महिलांना भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.