
माणुस वयाेवृध्द झाला की त्याला गरज असते ती आधाराची ,मायेची ,प्रेमाची आणि अपुलकीची.या उतार वयात सुखानं सांभाळावं एवढीच अपेक्षा असते.
आयुष्यात केलेल्या काबाड कष्टाने अनेकांचा संसार फुलताे ही पंरतु अनेक वयाेवृध्दाच्या वाट्याला येते ती उपेक्षा आणि मग म्हातार पणी सुरु हाेते फरफट.
अंगभर कपडे नाहीत.पाेटभर जेवन नाही का अधार देणारे काेणी सुरु हाेतात त्या जिंवत पणी मरन यातना.
राेज जिंवत राहुन मेल्या सारखं आयुष्य जेव्हा पदरी पडतं तेव्हा मात्र डाेळ्याच्या कडा आेलवतात
ज्यांना अपलं समजत हाेताे त्यांना अचानक आपण परके हाेताे.घरात तर साेडा अजुबाजुला हि फिरकुन देत नाही.ताजी भाकर नाही किमान शिळी शिल्लक भाकर हि देत नाहीत.तिच्या समाेर कुत्र्याला भाकर देतात पण ती मात्र तशीच वळचणीला पडुन राहते.
पाेटात लागलेली आग तिला गप्प बसुन देईना चार कपडे पाेत्यात हाेते तेच पाेतं एका हातानं आेढत काेणीतरी जेवायला देईल या आशेनं निघाली पण मिळाले काहीच नाही
शेवटी एका बंगल्याच्या बाहेर .थकलेलं अंग टाकुन दिलं.रात्री 10 वाजता फाेन आला आजीची झालेली अवस्था मन थाेडं गलबलले.मदती साठी निघालाे.पाेलिसाना फाेन केला पत्र तयार झाले
आजी जवळ पाेहचलाे थकलेल्या आवाजात चांगलाच कंप आला हाेता.आजी मदत करताे तुम्हाला.आजी म्हणाली कशाला करताे मदत देवानं मरम द्यावं नकाे असला जन्म
तिची केविलवाणी झालेली अवस्था पाहुन असवस्थ झालाे तिला मदत करुन आपल्या यशाेधन आश्रमात मध्ये घेऊन आलाे.जेवताना मात्र अश्रुनां वाट माेकळी करुन दिली.
आता ती यशाेधन आश्रमात सुखावली आहे थकलेलं शरीराला आणि मनाला हि आधार,प्रेम,माया आपुलकी मिळाली आहे.या पुढंच घर आणि प्रेम करणारी माणसं तीला यशाेधन आश्रमात मिळाली आहेत.
या पुढे अगदी प्रेमानं यशाेधन मध्ये संभाळ करणार आहाेत.कारण ॥माणुसकी अजुन जिंवत आहे॥
रवि बाेडके
गजानंत निवारा
यशाेधन ट्रस्ट वेळे सातारा
9922424236