आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-कराडच्या 24X7 पाणी आकारणीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती….राजेंद्रसिंह यादव यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश.

प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

कराडच्या 24X7 पाणी आकारणीला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती….राजेंद्रसिंह यादव यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश.

कराड : कराडच्या पाणी प्रश्नासंबंधी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली असून यासंबंधी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभराज देसाई यांच्यासोबत झालेल्या चर्चाचा वृत्तांत सांगितला. दरम्यान कराडच्या पाणी प्रश्न आकारणी संबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ राजेंद्रसिंह यादव यांच्या विनंतीनुसार कराड पाणीपट्टी आकारणीला स्थगिती देण्याचा आदेश केला आहे.अशी माहिती यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाचक पाणीपट्टीमध्ये सुट मिळवी. विषयास अनुसरुन आपणांस विनंती की, कराड शहर ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांचे कर्मभूमी आहे. या गांवामध्ये कराड नगरपरिषदेने ब्रिटीश काळापासून आजपर्यंत कराड शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा पुरवठा केला आहे. 24 x 7 पाणी पुरवठा योजनेचे काम चालू आहे हे अद्यापही पूर्ण नाही.

योजना कार्यान्वित नसताना प्रशासकांनी अन्यायकारक अशी पाणीपट्टीची आकारणी केली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना फार मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांनी पाणी बिले भरण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झालेला आहे. व योजनेचे काम चालू असल्यामुळे पाणी पुरवठा योजना सदोष आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन पाणी पुरवठा यंत्रनेमधील दोष दूर करुन, कराड शहरातील नागरिकांना सदरच्या पाणीपट्टी आकारणी मध्ये 50टक्के सुट मिळावी, आणि नागरिकांना दिलासा मिळावा.

दरम्यान 24X7 पाणी योजनेच्या बिल आकारणी संबंधी जिल्हाधिकारी यांनी सदर पाणीपट्टी आकारणीला स्थगिती दिले आहे. यामुळे कराडकर यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राजेंद्रसिंह यादव यांनी कराडकरांचा पाणी प्रश्न सुसह्य व्हावा. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना साकडे घातले होते. यानुसार सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button