आनेवाडी:-टोलनाक्याच्या संदर्भातील काँग्रेसच्या आंदोलनाने वाहन चालक सुखावले..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
टोलनाक्याच्या संदर्भातील काँग्रेसच्या आंदोलनाने वाहन चालक सुखावले..
आनेवाडी दि: सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी ता. जावळी व तासवडे ता. कराड असे ६० किलोमीटर अंतराच्या आतच दोन वसुली केंद्र आहेत. रस्ते दुरुस्त न करता राजेरोसपणाने टोल वसुली केली जाते. याबाबत आता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने आवाज उठवल्याने अनेक वाहनचालक सुखावले आहेत.
याबाबत माहिती अशी की, पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार मधील मुख्य रस्ता व सेवा जोड रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तरीसुद्धा आनेवाडी व तासवडे या ठिकाणी शक्तीने टोल वसुली केली जाते. याबाबत खरं म्हणजे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवून सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, सातारा जिल्ह्यात असे कधीच घडत नाही. प्रथमच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने आदरणीय नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील आनेवाडी टोल नाक्यावर टोल वसुलीला प्रकर विरोध करून घोषणाबाजी केली.
यावेळीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते राजेंद्र शेलार ,मनोहर बर्गे, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस नरेश देसाई, जावळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप माने, सादिकभाई शेख, युवा नेते विराज शिंदे, जयदीप शिंदे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस महिला पदाधिकारी रजिया शेख, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, प्राची ताकतोडे- कांबळे, अल्पना यादव व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आनेवाडी टोल नाक्यावर उपस्थित होते. पुणे-सातारा- कोल्हापूर पर्यंत महामार्गावर शेकडो खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना गतिरोधकापेक्षाही या खड्ड्यांमुळे ब्रेक वर पाय देऊन वाहन चालवावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रस्त्याची दुरावस्था होऊन सुद्धा महामार्ग व जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी खरं म्हणजे कायदा पालन करण्यासाठी महामार्गावरील सुव्यवस्था करून घेणे गरजेचे आहे. तरच सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची काम होणार आहे. परंतु असे अपवादात्मक रित्या घडते. आज जावळी तालुक्यातील आनेवाडी टोल नाक्यावर अक्षरशा वाहन चालक व आंदोलकांपेक्षाही पोलीस यंत्रणेच्या बंदोबस्त हा टोल वसुली केंद्राला संरक्षण देण्यासाठी होता का ? असा प्रश्न काही राजकीय पक्षांना पडला आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने आज केलेल्या आंदोलनामुळे टोल वसुली बाबत एक निश्चित धोरण राबवणे गरजेचे आहे. गेली चार दिवसापासून आंदोलनाची माहिती देऊन सुद्धा सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील एकही खड्डा बुजवण्याचे काम होऊ शकले नाही. याचाच अर्थ आनेवाडी व तासवडे येथील टोल वसुली केंद्राला खूप मोठे पाठ्यबळ मिळत आहे. याचा आता साताऱ्यातील जनतेने व मतदारांनी विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करावे. असे जाहीर आवाहन कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलेले आहे. या आंदोलनाला सातारा, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, जावळी तालुक्यातील सायगाव, आनेवाडी, रायगाव, कुडाळ, पाचवड, करहर येथील राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. वास्तविक पाहता हे आंदोलन महाविकास आघाडी म्हणून झाले असते तर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा बिगुल वाजला असता अशी चर्चा सुरू झालेली आहे.
————————————————–
फोटो -आनेवाडी टोल नाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोलविना वाहने सोडताना (छाया- अजित जगताप, सातारा)