दहिवडी:-दुष्काळी भागातील आयत्या बिळातील नागोबा…. बघा आत श्रेय घेण्यासाठी बोगदा…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
दुष्काळी भागातील आयत्या बिळातील नागोबा…. बघा आत श्रेय घेण्यासाठी बोगदा…..
दहिवडी दि:सध्या दुष्काळाची तीव्रता वाढली असून राज्य शासनाने माण -खटाव तालुक्यातील काही भाग हा दुष्काळी असूनही त्याचा समावेश दुष्काळ तालुक्याचे यादीत केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली असताना पुन्हा एकदा आंधळ बघतय , शाकाहारी बिर्याणी खातंय ,,,याची प्रचिती माण -खटाव वासियांना होऊ लागलेली आहे. आता १४ किलोमीटरचा बोगदा पूर्ण होताच आयत्या बिळातील नागोबा,,, बोगदा पाहणी करण्यासाठी पुढे येवू लागलेआहेत . अशी सत्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही जण गारुडीने पुंगी वाजली की जशा पद्धतीने डोलतात? तशा पद्धतीने काही जण आता उगीचच डोलू लागलेले आहेत.
माण -खटाव या दुष्काळी भागातील पावसाचे प्रमाण अल्प प्रमाणात आहे . या ठिकाणी इतर धरणातील पाणी देण्यासाठी वर्धनगड घाटातून बोगदा काढून हे पाणी आंधळी धरणापर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला होता. यासाठी केंद्र व राज्य सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केले. पण आता श्रेयवाद चांगलाच रंगू लागलेला आहे. विशेषता स्थानिक पातळीवर या संपूर्ण कामाचे श्रेय घेण्यासाठी काहीजणांनी चांगलीच मोठी फिल्डिंग लावलेली आहे.
राजकीय कोल्हाटी उड्या मारून आलेले काही महाभाग आता याचे श्रेय लाटत असल्याची टीका दुष्काळी भागातील जुने जाणते व ज्यांनी दुष्काळ बघून त्यावर मात केलेली आहे. मात करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.अशा जनतेला मात्र श्रेयवादाचा वीट आलेला आहे. माण- खटाव तालुक्यातील खेड्यापाड्यात उपसा सिंचन योजनेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रथम सुरुवात केली. त्याला कारणही तसं महत्त्वाचे आहे.
१४ किलोमीटर बोगदा काढून माण -खटावच्या साठ गावांना पाणी देण्यासाठी १४ वर्षाचा कालावधी लागलेला आहे. वास्तविक पाहता पिण्याच्या पाण्यावरच राजकारण करून आपलं शंभर नंबरी राजकारण रेमाटण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ परंतु, एखादी योजना चांगली झाली की त्याचे श्रेय घ्यायचे आणि खेड्यापाड्यांमध्ये सध्या वाढती गुन्हेगारी व दारूचा महापूर आणि मटक्याच्या जोडीला अनाधिकृत वाळू उपसा अशा बऱ्याच दोन नंबरच्या मालिका या माण -खटाव मध्ये पाहण्यास मिळत आहे. पण त्याबाबत कधीही आवाज न उठवणारे काहीजण आता जमिनीवरचे राजकारण लोकांना दिसते म्हणून आता बोगद्यातून राजकारण करू लागण्याची टीका माण खटाव तालुक्यातील काँग्रेस व शिवसेना वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करू लागलेले आहेत.
खटाव तालुक्याचे सुपुत्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारानुसार गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे संघाच्या प्रचारासाठी गेलेले स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव या जलसिंग जल उपसा सिंचन योजनेला देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची जपवणूक झाली आहे. हे खरे श्रेय हे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व आ. महेश शिंदे यांना निश्चितच आहे. खऱ्या अर्थाने या उपसा सिंचन योजनेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून २४७ कोटी मिळालेले आहेत. हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून माढ्याचे भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न केले. इतरांनी त्याला विरोध कधीच केला नव्हता. परंतु, सध्या ते परिपूर्ण सत्तेत नसल्यामुळे त्यांचा नाम उल्लेख टाळला जात आहे .ही बाब सुद्धा आता पुढे आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचं चित्र दिसत आहे.
जिहे- काठापूर योजनेमुळे २७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून हजारो शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या संसदीय समितीचे सदस्य म्हणून सुद्धा सातत्याने हा विषय लावून धरला होता. याबद्दल कुणाचे दुमत नाही. त्यासाठीच तर त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार बनवले होते. हे त्यांचे कर्तव्यच आहे. पण त्यातून मग राजकारण जर होत असेल तर ते कुणीतरी रोखले पाहिजे. असे स्पष्ट मत आता गावागावातून व्यक्त होत आहे. सदरची योजना ही खऱ्या अर्थाने २८७ कोटी रुपयांची होती. ती आता अडीच हजार कोटी रुपयांची झाल्याचे बोलले जात आहे. म्हणजे ही योजना सुमारे सव्वा दोन हजार कोटीने वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या वाटाघाटी झाल्या? हे सुद्धा जनतेसमोर आले पाहिजे. कारण, हा जनतेच्या करातून मिळालेला पैसा जर कुणाच्या खिशात जात असेल तर दुष्काळ परवडला. अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी निधी खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या या योजनेतून किमान चार टी.एम.सी. पाणी उपलब्ध होणार आहे. वास्तविक पाहता चार टी.एम.सी. पाण्यासाठी झालेला खर्च याचा बारीक तपशील जर पाहिला तर एक मोठे धरण उभं करता आले असते. याचा अनेकांना विसर पडलेला आहे .दुष्काळी भागाला पाणी मिळावे. ही सर्वांचीच इच्छा आहे. पण अजूनही प्रत्यक्षात ही योजना शंभर टक्के पूर्ण झाली नसताना सुद्धा ढोल वाजवण्याचा प्रकार निषेधार्थ असून भविष्यात याचे राजकारण होणारच आहे. सध्या माण खटावची औद्योगिक वसाहत शासकीय दरबारी धुळखात पडून आहे .त्याचे धूळ बाजूला करण्याचे सुद्धा कुणाच्या मनात येत नाही. त्यामुळेच तर या योजनेबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे.
—————————+—
फोटो कॅप्शन- दुष्काळी भागात 14 किलोमीटरचा बोगदा झाला पाणी केव्हा????? (छाया- निनाद जगताप दहिवडी)