सातारा:-भाजप नेते फडणवीस यांच्या बचाव करण्यास महायुतीचे आमदार नाखुश..?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
भाजप नेते फडणवीस यांच्या बचाव करण्यास महायुतीचे आमदार नाखुश..?
सातारा दि: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वेळा भूकंप घडवून सत्ता मिळवून देणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना आता लोकसभेच्या निवडणूक निकालावरून टार्गेट केले जात आहे. या लढवय्या नेत्याचा बचाव करण्यास महायुतीचे आमदार नाखुश असल्याचे चित्र दिसू लागले आहे. यशाला सर्व वाटेकरी असतात पण अपयशामध्ये कुणी नसतं. याचा सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुभव घेत आहेत.
नागपूरच्या रेशम बागेतील हे कमळाचे फुल अनेकदा टवटवीत झाले होते. राजकारणामध्ये अनेकांवर त्यांनी आरोप केले पण हे आरोप सिद्ध करण्यासाठी जे लागणारे पुरावे आहेत. ते त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा ते लपून राहिलेले आहेत. असा आजही त्यांच्याबद्दल बोलताना जाणवत असते. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने जानव्यातून बाहेर पडणारे नेते आहेत. त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचेच काम पक्षातूनच सुरू झालेले आहे. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही.
एकेकाळी या लढाऊ नेत्याचे नाव घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदारकी आमदारकी मिळवली. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर चोहीबाजूने टीका होत असताना त्यांचे निकटवर्तीय समजणारे भाजपचे दिग्गज मंडळी मौन धारण करीत आहेत.
साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे हे त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेच नेतृत्व मानतात. असे अनेकदा सिद्ध झालेले आहे .आता मात्र या तिन्ही आमदारांनी याबाबत अद्यापही स्पष्ट भूमिका प्रसारमाध्यमासमोर मांडलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील ३९ आमदारांसह शिवसेनेतून बंड करण्याचे धाडसी पाऊल टाकले होते. भाजपसोबत सरकार स्थापन केलं. महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती राज्याचा कारभार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा सुद्धा समावेश करण्यात आला. महविकास आघाडीच्या
नेत्यांकडून सातत्याने शिंदे- पवार -फडणवीसांवर टीकाही सुरू झाली .
अखेर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस यांनी दिनांक ९ ऑगस्ट रोजी काही मंत्र्यांची शपथविधी घेऊन त्यांचाही सत्तेत समावेश केला. याला चाणक्य नीति म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाव घेतले जात होते.
. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्व आहे. बहुजन समाजातील अनेक नेत्यांशी त्यांची राजकीय नाळ जुळलेली आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे व भाजपचे काही महत्त्वाचे नेते यांच्याबरोबरच नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे.
भाजप नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्यातील पदवी, उद्योग व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधल्या डीएसई संस्थेमधून प्रकल्प व्यवस्थापन या विषयात पदविका प्राप्त केली आहे. १९९२ साली त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण नागपूरचे महापौर होण्याचा मान त्यांनी पटकावला. ‘मेयर इन कौन्सिल’ या पदावरही त्यांनी चांगले काम केले आहे.
आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर टीकाटिपणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरून त्यांना मुक्त करून त्यांना भाजपच्या पक्ष पातळीवर काम करण्यास रस असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पण, निवडणुकीतील पराभव मुळे त्यांचा राजीनामा घेणे म्हणजे भाजपला कमीपणा वाटत आहे. एकेकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ताटकळत असणारे अनेक आमदार खासदार आता त्यांच्यापासून दूर जावे लागले आहेत. एका पराभवाने राजकीय कारकीर्दीला घरघर लागत असते. याचा अनुभव आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस घेत आहेत . राजकीय वैभव प्राप्त करून देण्यासाठी अनेकांबद्दल त्यांनी त्यांनी रान उठवले होते. आज तेच काही मंत्री ,खासदार- आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून राजकीय लाभ मिळणे कठीण बनले आहे. हे ओळखून आता आपले गुरु व मित्र बदलू लागलेले आहेत. याची आता राजकारणात चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे.
विधानसभा निवडणुकीला सहा महिन्याचा अवधी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांची युती मतदारांना मानवलेली नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सॉफ्ट कॉर्नर मिळत आहे. हे मात्र सिद्ध झाले आहे. त्याचाच लाभ उठवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मोर्चा बांधणी करावी अशी अपेक्षा शिवसेनेतील काही नेते व्यक्त करत आहेत.
——————————————-
चौकट —पुणे येथील कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात व महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना आलेले अपयश. याचे खापर आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जात आहे. या पाठीमागे नेमका हात कुणाचा आहे ? याचा शोध घेणे गरजेचे आहे.
—————————
प्रतिनिधिक स्वरूपातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस