मायणी:- महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
मायणी:- महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र.
बागेवाडी या गावी महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मादिराज हे शैव ब्रामण तर आईचे नांव मादलंबिका असे होते. नंदीश्वराचे भक्त जानवेदमुनी हे बसवेश्वरीचे गुरु होते. लहान वयात त्यांची मुंज करण्याचे ठरले तेंव्हा म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी वडिलांना विचारले मुलींची पण मुंज का करत नाहीत? जर हा धर्म मुलगा-मुलगी भेद करतो तर मी मुंजीला तयार नाही असे सांगून त्यांनी मुंजीला नकार दिला. मुलींनी सुध्दा यज्ञोपवीन धारण करून विद्यार्जन का करु नये असा प्रश्न त्यांनी वडीलांना केला. आपला मुलगा मुंज संस्कारास् अनुकूल नाही, हे त्यांच्या वडीलांना आवडले नाही. त्यामुळे अगदी लहान वयात घराचा व ब्राम्हण धर्माचा त्याग करून बसवेश्वर कुडलसंगम क्षेत्री गेले. बिज्जल राजाकडे त्यांना नोकरीस त्यांचे मामा बलदेव यांनी लावले. एक जुना ताम्रपट प्रशासनात मिळाल त्यावरील मजकुराचे वाचन कुणालाच करता येईना. बसवेश्वरांनी या ताम्रपटाचा उलगडा केला , त्यामुळे गुप्त खजिन्याचा शोध लागला. बसवेश्वर कोषाध्यक्ष झाले. स्त्री-पुरुष, उच्च-नीच, जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव बसवेश्वर यांचे कडे नव्हता. अनुभव मंडप येथे पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीयादेखील चर्चासंवाद करीत. जगातील पहिली लोकसांसद अनुभवमंटप नावारुपास आली , सर्व धर्माचे लोक चांभार , महार , मांग, तेली , कुंभार, शेतकरी या सभेचे सदस्य होते. १२ व्या शतकात महिलांना प्रतिनिधीत्व दिले गेले. आक्का महादेवी सारख्या विद्वान स्त्रिया चर्चेत भाग घेत असत. हे सर्व सदस्य एकत्र बसून त्यानी आदर्श जीवन कसे जगावे याचे नियम बनवले व ते आचरणात आणले. पुराण, कर्मकांडे सगळे नाकारून श्रमाला प्रतिष्ठा दिली, बालविवाहाला विरोध, पुनर्विवाह, विधवा-विवाह आणि आंतरजातीय विवाह संबंधाना पाठिंबा हे धोरण त्या काळच्या (१२ व्या शतकाच्या) मानाने कमालीचे क्रांतीकारक म्हटले पाहिजे. आजही २१ व्या शतकात जात-पात, धर्म यावरून सैराट सारख्या घटना घडताना दिसतात, पण १२ व्या शतकात या जुन्याट चालींविरुध्द बंड पुकारणारा, अतिशय प्रगत विचारांचा हा महामानव.
मौजीबंधन नाकारल्यानंतर कुडलसंगम येथे विद्या व भक्तिसाधना करण्यासाठी बसवेश्वर गेले. महार-मांग, उच्च-नीच या गोष्टिना ते थारा देत नसत.
हृदयशून्य हत्या करतो तो मांग आणि अभक्ष्य भक्षण करतो तो महार असे ते मानत. सर्व तळागाळातील लोकांना लिंगपूजा करण्यास सांगून शिवशरण हीच आपली जात असे ते सांगत , त्याकाळी अस्पृश्य लोकांना मंदीर प्रवेश निषिद्ध होता पण जर शिवलिंग च अंगावर धारण केले व त्याची रोज पूजा केली तर मंदीरात जायची गरजच काय ? ज्याने इष्टलिंग गळ्यात बांधले ते सर्व लिंगायत. नुसते देवाचे नांव घेत ५, ६ तास बसू नका तर तुमचे कर्म प्रामाणिकपणे करा.
“कायकवे कैलास “काम हेच परमेश्वर, हा मंत्र त्यांनी सर्वसामान्यांना सांगितला.
नागीदेव कांबळे या अस्पृश्याकडील जेवणाचा त्यांनी स्वीकार केला. कर्मठ लोकांना हे सर्व सहन होत नव्हते. हलैया चांभार व मधुवय्या ब्राम्हण यातील हलैया चांभारचा मुलगा व मधुवय्या ब्राह्मण यांची मुलगी यांच्या लग्नसाठी बसवेश्वरांनी त्या काळात पुढाकार घेतला. हे दोघेही इष्टलिंगधारक शिवशरण आहेत त्यामुळे त्यांची जात भिन्न नाही, ते लिंगायत या धर्माचे आहेत, असे बसवेश्वरांनी सांगितले. पण सनातन लोकांनी बिज्जल राजाचे कान भरल्यामुळे बिज्जल राजाने हलैया चांभार व मधुवय्या ब्राम्हण याना देहांत प्रायश्चित सांगितले. या दोघांचे बलिदान म्हणजे भारतातील जातीव्यवस्था मोडून काढण्याचे बाराव्या शतकातील आंदोलनाचे पहिले वहिले बलिदान होते, या सगळ्या घटनांनंतर सनातन्यांनी बिज्जल राजाला धर्मबुडव्या बसवेश्वरणवर कारवाई करा, अनुभव मण्टप वर बंदी घाला, जात-पात पूर्वीप्रमाने चालणार, महार-मांगांशी सोयरीक बंद करा, अशा मागण्या केल्या. यानंतर बसवेश्वर यांनी स्वतःहून महामंत्रीपदाचा त्याग करून कुडल – संगम क्षेत्री प्रस्थान केले. तेथे शिवाराधना, ध्यान करीन त्यांनी समय व्यतीत केला.
स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करण्यार्र्या , जातीभेद सारख्या अनिष्ट प्रथांशी लढणाऱ्या या महानायकाचा अंत वयाच्या ६३ व्या वर्षी कुडलसंगम येथे झाला. तेथे त्यांना लिंगैक्य प्राप्त झाले. अजूनही दूसर्या जातीतील , खालच्या जातीतील मूलाशी कीवा मूलीशी लग्न केल्यावर जावई किवा मूलीची हत्या होते यावरून अजूनही समाज सुधारत नाही याची खात्री होते. ऑनर किलिंग ज्याला महनतात त्या घटना खूप होत आहेत.
अजूनही २१ व्या शतकात मूलगी नको म्हणून स्त्री भ्रूणहत्या होतात. मुलगा-मुलगा हा भेद अगदी सुशिक्षित लोकांच्यात सुध्दा केला जातो. मुलगी असेल तर सगली कामे करा मात्र मुलगा असेल तर बायकांसारखी कामे करु नको अशी त्याला शिकवण दिली जाते. केवल जात पात या मुद्द्यांवरून आपल्याच अपत्याची हत्या केली जाते. ज्या लिंगायत धर्माचे संस्थापक, प्रचारक हे महात्मा बसवेश्वर त्या धर्मातल्या लोकांना सुद्धा त्यांच्या शिकवणूकीचा विसर पडलाय. अनेक पोटजातींमधे हा समाज विभागला गेला आहे आणि त्यातली शिलवंत, पंचम, जंगम असे अनेक प्रकार. इथेही (पोटजातीत) आपल्यापेक्षा खालच्या पोटजातीत विवाह होत नाहीत, नुसतेच बसवेश्वर जयंतीला हार घालायचे आणि त्यांच्या शिकवणूकीकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करायचे. १२ व्या शतकात यासाठी क्रांती कर महात्मा बसवेश्वर प्रगत विचारांचा हा महामानव, ज्याने स्त्रियांना चर्चेसाठी अनुभवमंडप सारखे व्यासपीठ उपलब्ध करून लिंगपूजा करण्याचा हक्क स्त्रियांना देखील दिला. ध्यान , विद्वत्तापूर्ण चर्चा, न्याय-निवाडा यात त्यांनी स्त्रियांना प्रतिनिधित्व दिले, अशा या महापुरुषाला त्यांचे जयंती निमित्त माझे शताशः नमन.