सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिकाच्या सुपुत्राची तक्रार.
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक (ORGANIZER)

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
उपसंपादक प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक (ORGANIZER)
RPS STAR NEWS
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिकाच्या सुपुत्राची तक्रार.
मायणी प्रतिनिधी-. . सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिक कै.शंकरराव चोथे यांचे सुपुत्र अरुण चोथे यांनी एका अर्जाद्वारे तक्रार केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की – ग्रामपंचायत कलेढोण यांनी गेली३५वर्षे न केलेली नोंद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात करुन स्वातंत्र्य सैनिकाचा केलेला सन्मान शासनाच्याच आदेशाने नोंद रद्द करुन माझ्यावर अन्याय करण्यात आला आहे.अशी तक्रार अर्जात केली आहे. अर्जात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मौजे कलेढोण ता. खटाव येथील ग्रामपंचायत मिळकत जंगम ४५४/१ ही मिळकत,स्व.वसंत वामन तारळेकर यांना एकट्याना मृत्यू पत्राने मिळालेली मिळकत,त्यांनी त्यांची मुलगी स्व.उज्वला अरुण चोथे यांना दि.३-३-१९८९ रोजी रजिस्टर बक्षीस पत्राने दिलेली आहे. सदर मिळकतीची कलेढोण सि.स. नं.१३३०ला नोंद घेऊन पुढे वारस नोंद झालेली आहे.ग्राम पंचायत कलेढोण यांनी अनेक वर्षे अर्ज देऊन न केलेली नोंद दि.२७-१२-२०२२चे मासिंग मीटिंगमध्ये करुन पुढे वारस नोंद केलेली आहे.मा.गटविकास अधिकारी यांचे पत्रातील आदेशाने ग्रामपंचायत मासिक मीटिंग दि.३०-१०-२०२३ ने आमची झालेली नोंद रद्द करुन पहिलीच नोंद पुन्हा पूर्ववत केली आहे. सदर नोंद रद्द करणे विषयीचे अधिकार मा. गटविकास अधिकारी खटाव यांना आहेत का? व त्यांनी कशाच्या आधारे न्यायालयाची स्टे ऑर्डर नसताना सुद्धा आदेश दिलेले आहेत,हे समजून येत नाही.मा.गटविकास अधिकारी यांचे पत्रातील वडिलार्जित आणि दि.२२-२-१९८९चे वाटणी पत्राचे मुद्दे न्यायालयाने दावा क्र.१९०/२०१०चा निकाल आमच्या बाजूने दिल्याने संपलेले आहेत. सदर निकालास न्यायालयाची स्टे ऑर्डर नसलेने कलेढोण ग्रामपंचायत ने दि.२७-१२-२०२२ चे मासिक मीटिंग मध्ये आमची नोंद करुन पुढे वारस नोंद केलेली आहे.मा.गटविकास अधिकारी यांनी सदरचे आदेशाचे पत्र देणेेपूर्वी मला माझी बाजू मांडणे ची संधी दिलेली नाही.दिनांक३०-१०-२०२३चे ग्रामपंचायत मीटिंगला मी उपस्थित राहून मला माझी बाजू वरिष्ठांच्या कडे मंडणेसाठी व नोंद न करता पुढील मासिक मीटिंग पर्यंत नोंद करु नये,असा अर्ज देऊनही नोंद केली आहे. दि.३०-१०-२०२३ची मासिक मीटिंग चे प्रोसिडिंग पूर्ण केले नंतर सदरचे प्रोसिडिंग पूर्ण केलेनंतर सदरचे प्रोसीडिंग वर सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांचा शिक्का नाही.याचा अर्थ असा होतो की सदरचा झालेला ठराव सरपंच व सर्व सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना मान्य नाही. माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन दि.२७-१२-२०२२ रोजी सर्वानुमते केलेली नोंद पूर्ववत करणेबाबत ग्रामपंचायत कलेढोण यांना आपले स्तरावरुन सूचना देण्यात यावी व माझ्यावरील अन्याय दूर करावा अशी विनंती करुन,मी आपणाकडे अर्ज करुन महिना होत आला तरी दखल घेतली जात नाही तर मी दाद कुणाकडे मागायची असा सवालही चोथे यांनी केला आहे.