सातारा:-आर.पी.आय. क्रांती दिनापासून साताऱ्यात आरक्षण बचाव अभियान राबवणार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आर.पी.आय.क्रांती दिनापासून साताऱ्यात आरक्षण बचाव अभियान राबवणार.
सातारा दि: भारत स्वतंत्र झाल्यापासून आरक्षण या मुद्द्यावर (पूर्वीचे महार) म्हणजेच बौद्ध, हिंदू मातंग आणिहिंदू चर्मकार या जाती लाच आरक्षण मिळते. असा समज आहे. परंतु अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणासाठी ५९ जातींचा समावेश आहे. आंदोलनात सक्रिय सहभाग होणाऱ्या तीन जातीसाठी आरक्षण बचाव अभियान राबवून या तीन जातीचा आरक्षणाचा वाटा वाढवून मिळावा. यासाठी हे आरक्षण बचाव अभियान असल्याची माहिती आर.पी.आय. गवई गटाची सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिली आहे. दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी हलगी नाद आंदोलन, शनिवारी व रविवारी १०,११ ऑगस्ट धरणे , सोमवारी १२ रोजी थाळी नाद, मंगळवार १३ ऑगस्ट घंटानांद , बुधवार दिनांक १४ रोजी बोंबाबोंब, गुरुवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मुंडन आंदोलन व शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी ””””’ ये आजादी झुटी है! देश की जनता भुके…. हा नारा देत उपोषण करणार आहेत. आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई साहेब, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे, यांच्यासह युवा जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, सुहास मोरे, भिकाजी सपकाळ, दीपक कदम, आशुतोष वाघमोडे, दीपक जामदार, अभिजीत गायकवाड, प्रशांत उबाळे, रेखा सकटे, रोहिणी माने, ऍड पायल गाडे -जगताप ,चंद्रकला कांबळे, सुनीता येवले, प्रतीक गाडे आदी मान्यवर या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. शिक्षण, नोकरी, स्थानिक स्वराज्य संस्था, औद्योगिक वसाहत, आणि राजकीय आरक्षणाचा लाभ या तीन जातींना मिळाला नाही. वास्तविक पाहता या तिन्ही जाती आरक्षण बचाव आंदोलनासाठी नेहमीच सक्रिय असतात. परंतु ,इतर जातींना सक्रिय सहभाग घेताना संकोचित वाटत असते. यातील काही कार्यकर्ते सहभागी होतात परंतु, त्यांची संख्या कमी असल्यामुळे न्यायासाठी आता ज्यांना आरक्षण हवे आहे .त्यांनी लढा सुद्धा तेवढ्या वाट्याने उचलला पाहिजे. हे याच आरक्षण बचाव अभियानाची संकल्पना आहे. ५९ जाती साठी आरक्षण असून फक्त तीनच जातींना याचा लाभ होतो. असा खोडसाळ व खोटा प्रचार राजकीय पक्ष करून छोट्या छोट्या जातींना आपल्याकडे आकर्षित करून त्यांचा राजकीय लाभ घेत असतात. आता अनुसूचित जाती जमाती मध्ये जागृती झालेली आहे. एक मराठा.. लाख मराठा.. या धर्तीवर आता या तिन्ही जाती एकत्र येऊन तीन जाती,,, तिघेच न्यायासाठी अनुसूचित जाती.. असा आता नवीन समीकरण केले जाणार आहे. या आरक्षण बचाव अभियानातून कोणत्याही जातीला कमी लेखणे. हा उद्दिष्ट नसून त्यांनी सुद्धा आत्मचिंतन करून सर्वव्यापी आंदोलन उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे सामुदायिक ताकद वाढून सर्वांनाच न्याय मिळणार आहे. सध्या आरक्षणाचा अनुशेष भरला जात नाही. मागासवर्गीय पदोन्नती दिली जात नाही. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी खोटे तक्रारी अर्ज करून त्यांना त्रास दिला जातो. खाजगी क्षेत्रात कर्नाटक व हरियाणा प्रमाणित महाराष्ट्रातही आरक्षण लागू करावी. अशा या प्रमुख मागणी आहे. सध्या अनुसूचित जातीतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सवलती पासून वंचित ठेवले जाते. आणि त्याची सुरुवात ही जातीचे दाखले वितरण करण्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच आरक्षण बचाव अभियानात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. हा लढा हा फक्त कुठल्या संघटना, संस्था अथवा कार्यकर्त्यांचा नसून ज्येष्ठ विचारवंत ,साहित्यिक, लेखक, पत्रकार, प्रतिष्ठित मंडळी खरेखुरेआंबेडकरवादी, मनापासून परिवर्तनवादी, सर्वांचे न्यायासाठी लढणारे समतावादी, देशावर खरे प्रेम असणारे संविधान प्रेमी अशा सर्व लोकांचा आहे. या सर्वांनी सहभागी व्हावे. त्याचबरोबर गरीब व गरजू कुणबी,मराठा ओबीसी, धनगर, आदिवासी यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, अनुसूचित जातीचे झिरो पॉईंट तीन टक्के आरक्षण शंभर टक्के भेटलेच पाहिजे. असाही नारा देण्यात आलेला आहे. या आरक्षण बचाव आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झालेली असून मातंग चर्मकार व बौद्ध वाड्या वस्तीमध्ये त्याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे श्री गाडे यांनी सांगितले..
……………………………………….
फोटो -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष संजय गाडे व ज्येष्ठ नेते चंद्रकांत कांबळे…