सातारा:-बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणला ,, आंबेकरांचा जिव्हाळा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणला ,, आंबेकरांचा जिव्हाळा.
सातारा दि: मराठी भाषेमध्ये सुमारे दोनशे वर्षांपूर्वी दर्पण हे नियतकालिक प्रसिद्ध करून खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात वृत्तपत्र व्यवसायाचे बीज रोवले आहे. आज सहा जानेवारी म्हणजे दैनिक दर्पण चा शुभारंभ दिवस साजरा होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पत्रकार परिषद व सातारा शहर पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक वक्त्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची नव्याने ओळख करून दिली पण साताऱ्यामध्येपत्रकार कॉम्रेड वसंत आंबेकर यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी स्वतः खडू फळा घेऊन सातारकरांना माहिती व बातमी समजावी यासाठी फलक लावला होता. या गोष्टीलाही आता बराच वेळ झालेला आहे. पण, नव पिढीला त्याची माहिती समजण्यासाठी जांभेकर यांचा दर्पण ला आंबेकरांचा जिव्हाळा लाभल्याचे दिसून आले आहे.
सातारा जिल्ह्याला पत्रकारितेची भली मोठी परंपरा आहे. एवढेच नव्हे तर सातारच्या मातीतून दैनिकाची परंपरा जपण्याचे काम हे चळवळीतून पुढे आलेले आहे. त्यामध्ये ऐक्याचे चंडीराम पळणीटकर, ग्रामोद्वारचे रामचंद्र तथा भाऊसाहेब जाधव, हरिभाऊ निंबाळकर, आनंदराव कुलकर्णी, ह न दीक्षित, च ने शहा ,रवींद्र बेडकीहाळ ,बाळासाहेब बहुलेकर, बाबा खांडेकर महाराष्ट्र मित्र, साप्ताहिक समर्थ , गोदातीर तसेच वा सू देशपांडे, ढवळे यांचे साप्ताहिक श्री शाहू व अलीकडच्या काळामध्ये दैनिक सांजवातचे घनश्याम छाबडा, दैनिक मुक्तागिरीचे अनिल देसाई , दैनिक साहस वार्ता चे मुळे, दैनिक सातारा न्यूज चे प्रकाश शिंदे व अशा अनेक मान्यवरांनी सातारच्या पत्रकारितेमध्ये एक वेगळी व्यवसायिक उंची निर्माण केली आहे .पत्रकारिता करत असताना बातम्यांची देवाणघेवाण एवढ्या पुरतच मर्यादित काम न करता समाज मनावर प्रतिबिंबित झालेल्या अनेक आंदोलनामध्येही पत्रकारांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
यामध्ये उल्लेखनीय जर नाव घ्यायचा असेल तर जुन्या काळातील निर्भीड व निस्वार्थी पत्रकार वसंत आंबेकर यांनी बातमीदारी सोबतच क्रांतिसिंह नाना पाटील ,प्राध्यापक पी जी पाटील, प्राध्यापक गायकवाड, बाबुराव जंगम, कर्मवीर भाऊराव पाटील, किसनवीर आबा, विठ्ठलराव जगताप, बाबुराव घोरपडे, दादासाहेब जगताप ,आबासाहेब पार्लेकर, चहावाले निगडीकर आचार्य अत्रे, रंगाआण्णा वैद्य, नानासाहेब गोरे ,एस एम जोशी लोकशाहीर अमर शेख, कॉम्रेड नारायण माने, वा रा कोठारी बळवंत आंबोले ,नाथाजी लाड, हिराबाई पवार, शेख अशा अनेक दिग्गज मंडळींच्या सोबत लोक चळवळ उभी केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्नाचे दर्पण सरकारला दाखवून प्रश्न सोडवताना त्या प्रश्नासाठी लढणारे जे कार्यकर्ते होते. त्यांच्याशी जिव्हाळा निर्माण करणारे आंबेकर या पत्रकारांनी सुद्धा खूप मोठे योगदान दिलेले आहे.
आज खऱ्या अर्थाने पत्रकार वसंत आंबेकर यांचे चिरंजीव पत्रकार बाळासाहेब आंबेकर व नातू सुजित आंबेकर यांनी पत्रकारिता करत असताना जांभेकर ते आंबेकर अशा सर्व परिवर्तन व तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ झालेल्या पत्रकारितेबद्दल एक नवा आयाम दिलेला आहे. आज पत्रकारिता दिन साजरा करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जेव्हा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांच्याशी वार्तालाप केला .त्यावेळी या वयातही पत्रकारिता संघटनेबाबत केलेल्या कामांचा लेखाजोखा त्यांच्या स्मरणात आहे. हेच मोठे भाग्य आहे.
साधारण १९७० ते१९७५ या कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे दोन दिवस शिबिर झाले होते. या पत्रकारांच्या शिबिरासाठी स्वतंत्र सैनिक किसनवीर आबा यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभागृह उपलब्ध केले तर शानबाग यांनी रजतांद्री हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती.
त्याकाळी वसंत चौधरी हे माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे उपसंचालक होते. या वेळेला जिल्हा माहिती अधिकारी शिवाजीराव पाटील, दादासाहेब जगताप, राजारामबापू पाटील, किसनवीर आबा, पा. बा. खांडेकर, बाळासाहेब बहुलेकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते. आता पुन्हा सातार मध्ये सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार पी एस ओ च्या धर्तीवर सातार मध्ये पत्रकारांना प्रशिक्षित करण्यासाठी जर कार्यशाळा घेतली तर त्याला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे. आज सातारा पत्रकार संघ, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नवीन पिढी तयार होत असून या नवीन पिढीला अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष हरीश पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार सुजित आंबेकर प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे सनी शिंदे राहुल तपासे, माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सुजित आंबेकर त्याचबरोबर इतर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जे पहिले नियतकालिक केलेले आहे तो दिवस म्हणजे पत्रकार दिन म्हणून साजरा होत आहे त्याचबरोबर साताऱ्यात कॉम्रेड वसंत आंबेकर यांनी पवई नाक्यावरती फळ्यावर खडू नये दिवसभरच्या घडामोडी लिहून खऱ्या अर्थाने पत्रकारितेची सुरुवात केली आहे त्यांची आठवण म्हणून हा उजाळा अनेकांनी दिला आहे.
—————————&——————————–
फोटो -सातारा येथील पत्रकारितेच्या आंबेकर कुटुंबीयांचे योगदान व सातारा नगर परिषदेने केलेल्या कौतुक (छाया- मृणाल देवकुळे, सातारा)