वडूज:-आत्महत्येबाबत आरोपींना त्वरित अटक करण्याची गोरेगाव ग्रामस्थांची मागणी..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
आत्महत्येबाबत आरोपींना त्वरित अटक करण्याची गोरेगाव ग्रामस्थांची मागणी..
वडूज दि: वडूज पोलीस ठाणे अंतर्गत गोरेगाव निमसोड येथील आनंदा बाबुराव डोईफोडे वय -४० यांना दि ११ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता माती विकण्याच्या प्रकरणामुळे आरोपींनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे विष प्राशन करून आनंदा डोईफोडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आहे. दरम्यान, फिर्यादीच्या बंधूचा मृत्यू झाल्यास आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आनंदा डोईफोडे जिवंत असताना केली होती पण सध्या ३०६,३२,३३४,५०५,५०६ कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे. परंतु अद्यापही आरोपींना अटक केली नाही. ही बाब समोर आलेली आहे. गोरेगाव निमसोड या ठिकाणी गावातील लोकांच्या समोर दि ११ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता मारुती मंदिरासमोर असताना गोरेगाव गावातील सुशील कुमार उर्फ पिंटू दत्तू डोईफोडे, तसेच ज्ञानेश्वर गोविंद पाटील यांनी मारहाण केली. एवढेच नव्ह तर हाताने चापटी मारून छातीवरती कोपऱ्याने मारहाण केल्यामुळे आनंद डोईफोडे यांना खूप वेदना होत होत्या. ते गावात तडफडत असताना मध्यस्थी करून शांतता प्रिय ग्रामस्थांनी त्यांना सोडविले . त्यानंतर आनंदा डोईफोडे यांच्यावर वडूज ग्रामीण रुग्णालय व सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय या ठिकाणी उपचार करण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.
त्यांनी पिकावर फवारणी करणारे कीटकनाशक औषध पिऊन आपली जीवन यात्रा संपवली. या सर्व घटनेला जे जबाबदार आहेत. त्या सर्व आरोपींच्या विरोधात घटना घडल्यानंतर पाच दिवसाने या आरोपींना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आठवड्यावर या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले सुशीलकुमार डोईफोडे, ज्ञानेश्वर पाटील, रमेश महाराज हे जबाबदार असल्याचे तक्रार करण्यात आली असून पोलिसांबद्दल तक्रार नाही. असा अत्यंत शांत बुद्धीने पोलिसांनी जबाब लिहून घेतलेला आहे.
सदरच्या घटनेनंतर गोरेगाव निमसोड व कदमवाडी या ठिकाणी असणारे आरोपी यांना अद्याप अटक केलेली नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्था किती कुचकामी आहे. याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झालेली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने गंभीर दखल घेतल्यामुळेच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण त्यांना अटक झालेली नाही. ही अटक त्वरित करून त्यांना पोलीस कोठडी द्यावी. तसेच न्यायालयामध्ये त्यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीने पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावा. कारण फिर्यादीच्या बंधूंचा एक प्रकारे खूनच झाला आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा व्हावी. अशी मागणी होऊ लागलेली आहे. पोलीस यंत्रणेने कुठलाही हलगर्जीपणा करू नये अन्यथा भविष्यात या प्रकरणाचे पुनरावृत्ती होऊन सर्वसामान्य कष्टकरी शेत मजूर यांना जीवास मुकावे लागेल. असं काही ग्रामस्थांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान याबाबत वडूज पोलीस ठाणे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
———————————————
फोटो -बारा हा मृत्यू पावलेले आनंदा डोईफोडे रा. गोरेगाव निमसोड