ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-राजकारण स्वार्थाचे झाले आहे. त्यांना जनता धडा शिकवेल– आमदार भाई जगताप.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राजकारण स्वार्थाचे झाले आहे. त्यांना जनता धडा शिकवेल– आमदार भाई जगताप.

सातारा दि:
दहा वर्षापूर्वी एकमेकांनी विरोधी आरोप केले होते.आज सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत .राजकारण स्वार्थाचे झाले आहे. त्यांना जनता धडा शिकवेल अशा शब्दात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार व सातारा जिल्हा निरीक्षक भाई जगताप यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सध्याच्या ट्रीपल इंजिन राज्य सरकारच्या बद्दल टीका केली..
महाराष्ट्रातील खोके राजकारणा बद्द्ल येथील जनता माफ करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुरोगामी हिंदुत्व व प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख करीत आहेत. आम्ही काँगेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा अजेंठा सोडलेला नाही. संघर्ष करीत आहे. नगर सेवक, आमदार, खासदार कोण? हे निवडून देण्याची प्रक्रिया मतदारांना समजते. त्यामुळे देशात आराजकता असल्याने भाजप नको. बाकी कोणी ही चालेल. अशी मतदारांची मानसिकता बनली आहे. असे ही आ.भाई जगताप यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रभारी नाना चव्हाण, डॉ सुरेश जाधव, सुरेश शिंदे, उदयसिंह पाटील, जगन्नाथ कुंभार, संदीप चव्हाण, नजिम इनामदार,मनोजकुमार तपासे , बाळासाहेब शिरसाठ,नरेश देसाई, ध्येयशील सुपले
महिला पदाधिकारी अल्पनाताई यादव, उत्तेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महविकास आघाडी आहे. आम्ही एकत्र निर्णय घेणार आहे. सातारा जिल्ह्यातील निवडणुकीत वीस वर्षे हाताचे चिन्ह नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची आहे .अशी स्थिती आहे. अशा वेळी फूट पडल्यानंतर राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटात खासदार आहेत ? हे खा .श्रीनिवास पाटील यांनी सांगावे. अशी मागणी करून आ. भाई जगताप पुढे म्हणाले, राष्ट्रीय कार्यकर्त्या मध्ये उत्साह आहे. हा ४८ सातारा लोकसभा मतदरसंघातील आढवा घेत आहे. देशातील पत्रकारिता थोडी वाईट आहे. पण ,महाराष्ट्र राज्यातील पत्रकारिता चांगली कामगिरी करीत आहे.
राजकीय दृष्ट्या निवडून दिले आहे. त्याविरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चुकीचे धोरण असेल तर रस्त्यावर लढले पाहिजे. अस्तित्व दाखवले पाहिजे. आघाडीच्या मुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर अन्याय होत आहे. तरुण वर्ग काँग्रेस सोबत नाही. आताच्या पिढीचा गुगूल गुरू आहे.
तरुणाई सोबत घेऊन बुध कमिटी करून चुका दुरुस्त करीत आहोत. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तीन हजार सहाशे किलोमिटर होती.ती तीनशे किलोमिटर काश्मीर मध्ये वाढली. गुप्तचर यंत्रणांनी बॉम्ब हल्ला होईल. असे सांगितले पोलीस सोडून पाळले होते. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण झाले.भारत जोडताना सफेद पोशाख लाल झाला तरी चालेल असे सांगून राहुल गांधी फिरत होते.
भाजपला लोकांनी आशेने निवडून दिले. निराश झाली.४१८ रुपयांचा सिलेंडर ११३५ झाले. भाजप महिला नेत्यांच्या तोंडाची माशी हलत नाही. स्मुर्ती इराणी. चित्र वाघ या महिलेची धिंड काढली तरी रामायणाच्या, धर्माच्या गोष्ठी सांगतात . विचार पक्का असेल तर कोणाला घाबरायचे? सर्व्हे बाबत कमी बोलले बरे. स्थानिक पातळीवर झालेला सर्व्हे खरा असतो .
काँग्रेस पक्षाच्या विश्वास वाढला आहे. सोशल मीडिया वर भाजप पक्ष
चाळीस पैसे एका पोस्टला चाळीस पैसे देतात.म्हणून काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत असा ही आरोप त्यांनी केला.असे ही त्यांनी शेवटी सांगितले.
—————————————-
फोटो – आ. भाई जगताप यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button