सातारा:-महाविकासआघाडी व महायुती म्हणजे घराणेशाही पुरस्कृत संस्था- अमोल गंगावणे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
महाविकासआघाडी व महायुती म्हणजे घराणेशाही पुरस्कृत संस्था- अमोल गंगावणे.
सातारा दि: सध्या लोकसभा निवडणुकीला उमेदवारी कोणाला मिळणार ? याची चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये सामान्य मतदारांना गृहीत न धरता घराणेशाही व प्रस्थापित मंडळींची नावे पुढे आणली जात आहेत. महाविकास आघाडी व महायुती या नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारणामध्ये घराणेशाही पुरस्कृत करणाऱ्या या दोन संस्था आहेत. त्यापासून मतदारांनी सावध राहावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अमोल गंगावणे यांनी केले आहे. त्यामुळे सामान्य मतदारांनी आपलाच प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावे. असे ही स्पष्ट केले आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी व महायुतीची चर्चा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. एका बाजूला भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, सरकारी सेवेतील खाजगीकरण, कंत्राटीकरण दुसऱ्या बाजूला प्रस्थापित वर्गालाच प्रतिनिधित्व मिळावे. म्हणून माध्यमातून स्पर्धा सुरू झालेली आहे. पैशातून प्रतिमा दाखवून सामान्य मतदारांपर्यंत छुप्या पद्धतीने काही ठराविक उमेदवाराचा प्रचार सुरू झालेला आहे. वास्तविक संदर्भ व घटनेचे भान मतदारांना असते. सामान्य मतदार हा त्यांच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षात स्वतःला विसरून जातो. अशावेळी त्याच्यावर झालेला अन्याय व त्याला भोगावे लागल्याने दुःख याचे प्रतिबिंब कधीही दिसत नाही. फक्त गोंडस जाहीरनामा व वचननामा काढला जातो. पण त्याची पूर्तता झाली आहे का नाही ? याची कधीही नेते स्पष्टीकरण देत नाहीत.
अगदी मागील पाच वर्षाचा जर जाहीरनामा किंवा वचननामा जर पुन्हा मतदारांनी वाचला. तर त्याच्या लक्षात येईल की, आपली किती फसवणूक झालेली आहे.? त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील मतदार हे आता खऱ्या अर्थाने मतदान करताना त्याचा विचार करतील का ? हाच प्रश्न आहे.
सातारा जिल्ह्यात १८ लाख ६८ हजार १६६ मतदार असून यामध्ये पुरुष मतदार नऊ लाख ४८ हजार५६७ व महिला मतदार नऊ लाख१९ हजार ५३२ आहेत तृतीयपंथी६७ मतदार आहेत एकूण २३१० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदारांपैकी गेले वीस पचवीस वर्षात
खासदार म्हणून निवडून आलेले काही जण त्यांच्या वाड्या वस्ती वरती पोहोचले नाहीत. तरीसुद्धा त्यांनाच मतदान होत आहे. आता परिवर्तन करणे गरजेचे आहे. यासाठी आता पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत जनजागृती करत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व त्यांचे सर्व सहकारी हे तळागाळातील सामान्य माणसांना पुढे आणण्यासाठी उमेदवारी मागतील. या भीतीपोटीच त्यांना जास्तीत जास्त जागा देण्यास टाळाटाळ केली जाते. मताची विभागणी होऊन पुन्हा भाजप सरकार जातीयवादी पक्ष सत्तेवर येण्याची चिन्ह आहेत. हे सांगण्याची कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. मताची विभागणी झाली तर भाजपला फायदा होईल ? याची सर्वात जास्त माहिती काँग्रेस पक्षाला आहे. किंबहुना महाविकास आघाडी ही स्वतःच्या उमेदवाराला विजयी करण्यापेक्षा भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील ? यासाठी झटत आहे. अशी शंका घेण्यास वाव आहे. त्यात काही अंश तथ्य आहे असे वाटते. कारण, पुन्हा प्रस्थापित मंडळींना उमेदवारी मिळावी असं काही लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणणाऱ्यांनी मनापासून प्रयत्न सुरू केले आहेत.
सामान्य उमेदवाराला मत देऊ नये अशीच बांधणी केली जात आहे. पण, आज नवं पिढी व नव मतदार हा फसणारा नाही. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वस्तुनिष्ठ माहिती मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी ही नाही रे वर्गाला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आतापर्यंत ज्यांना ज्यांना वंचित बहुजन आघाडीने आमदारकी दिली आहे. त्यांना फोडण्याचा ज्यांनी धन्यता मानलेली आहे. असे आता पुन्हा एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, किसनवीर आबा यांचे नाव घेऊन मताचा जोगवा मागत आहे. दुसऱ्या बाजूला भाजप नरेंद्र मोदी म्हणजे मोदी सरकार असा प्रचार करून लोकांच्या जनजागृती करत आहे. खरोखरच मोदी सरकार म्हणजे भ्रष्टाचार आणि लोकांची फसवणूक व जातीयवाद करत आहे. मोदी है तो मुनकीन है हे आता भ्रष्टाचाराचे दुसरे नाव झालेले आहे. हे मतदारांच्या लक्षात आणून देत आहेत .आणि याला काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे. कारण भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या यादीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचेच नेते जास्त आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडी म्हणजे आजही राजकीय अस्पृश्य वाटत आहे. ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी लोकसभेची निवडणूक हे प्रवेशद्वार ठरणारे आहे . वंचित घटक काला उमेदवारी दिली जात नाही. मात्र त्यांच्या मतदारांनी पारंपारिक रित्या प्रस्थापितांना मत द्यावे. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे.असे ही श्री अमोल गंगावणे यांनी स्पष्ट केले .या वेळेला बाबासाहेब ओव्हाळ ,मुकुंद कांबळे, मिलिंद कांबळे, गणेश गायकवाड, विशाल भोसले, अन्वर खान, शौकत शेख, विजय पाटील ,चंद्रकांत कदम ,विकास जाधव, अमित जगताप, संदीप भालेराव, संदीप कांबळे, संजय माने,सुधाकर वाढते उपस्थित होते.
———————————————–
फोटो -आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या समवेत युवा नेते अमोल गंगावणे