वाई:-!! राजकारणातील चड्डी बनियान गॅंग !!
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
!! राजकारणातील चड्डी बनियान गॅंग !!
भारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कधीकाळी चड्डी बनियान गॅंगने प्रचंड धुमाकूळ घातला होता, एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. आजच्या घडीला संपूर्ण देशात राजकारणाच्या बाबतीत तसाच अनुभव येतो आहे देशात केंद्राच्या सत्तेत बसलेले बीजेपीचे महाबली, चहावाले ५६ इंच छाती असणारे बनियानधारी शेठजी तर सोबतीला हाफचड्डीवाले तुरुंगवास भोगलेले राजकीय चाणक्य दोघांनी मिळून संपूर्ण देश वेठीला धरला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे कुणालाही देणे घेणे नाही, ज्या त्या राज्यात लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना केंद्रीय तपास यंत्रणेंचा धाक दाखवून पळवा पळवी सुरू आहे, हे लोकशाही उध्वस्त करण्याचे षडयंत्र राजरोजपणे चालू आहे, मात्र मतदार राजा हे सर्व निर्विकारपणे पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही हे जगातील सर्वात प्रबळ अशा भारतीय लोकशाहीचे यश आहे का अपयश आहे या द्विधा मःनस्थितीत सामान्य जनता आहे अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ देशमुख यांनी दिली आहे.
भ्रष्टाचाराने बरबटलेले नेते संभाव्य कारवाई पासून स्वतःची सुटका करून घेण्याकरता व पुन्हा राजकारणात स्थिरस्थावर होण्याकरता बऱ्याच जणांनी पक्ष फुटीचा मार्ग स्वीकारला आहे, हे सर्व केंद्र सरकारच्या पुण्याईने/सहकार्याने चालू आहे हे अगदी सूर्यप्रकाशाईतके स्वच्छ आहे गेल्या दोन वर्षातील राजकारणाचा ट्रेंड पाहिला तर भ्रष्टाचारात गुंतलेले आमदार, खासदार शोधून त्यांना कारवाईचा धाक दाखवून अपेक्षित संख्या असणारा गट फोडून पक्षावरच दावा सांगण्याचा राज्यातील हा दुसरा प्रकार आहे, या सर्व कारस्थानांचे रिंगमास्टर श्री देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्रात फार कमी मुख्यमंत्र्यांना संपूर्ण ५ वर्षाचा कालावधी मिळाला त्यात श्री देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागतो, फार कर्तबगार मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा लोकांमध्ये तयार व्हायला लागली होती तेच आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत. या सर्व राजकीय उलथापालथीमध्ये चड्डी बनियान गॅंगचे सुकाणू त्यांच्याच हाती आहे. हे महाशय शाश्वत धर्म विसरले, आपत् धर्म विसरले आणि नवीनच ‘फोडून२०’ धर्माची संकल्पना त्यांनी लोकांसमोर मांडली हे फार विदारक आहे, लोकशाहीला घातक आहे. हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे बहाद्दर सत्तेच्या वळचणीला उभे असल्याचे चित्र आहे, काहीही करून २०२४ ला भारतीय जनता पार्टीला देशात सत्ता आणावयाची आहे त्यासाठीच हा सर्व उपद्व्याप चालू आहे, हळूहळू ही दंगल आता लोकशाहीतील निवडणुकीच्या मैदानापर्यंत पोहोचेल तेव्हाच सामान्य नागरिकांना यावरील इलाज सापडेल.
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली देशाचे जाणते राजे श्री पवार साहेब गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंच्या कै.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले, माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब व श्री शरद पवार साहेब यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे तरीसुद्धा श्री पवार साहेब यांच्या स्वागताला श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हजर होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते, आजमीतिला ज्यांचे राजकीय चारित्र्य एकदम स्वच्छ आहे असे फार कमी लोकप्रतिनिधी देशात शिल्लक आहेत त्यामध्ये आ. पृथ्वीराज बाबांचा अगदी वरचा क्रमांक लागतो. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकमेकांचे सहकारी आहेत आ. पृथ्वीराज बाबांनी सर्व गिले-शिकवे बाजूला ठेवून नैतिकता, नितीमत्ता, तत्त्व निष्ठा व पुरोगामीत्व याचा आदर्श घालून दिला श्री शरद पवार साहेबांच्या साथीला खंबीरपणे उभे राहिले, आजच्या घडीला देशात काँग्रेस हा एकमेव पर्याय लोकांसमोर आहे जो देशाच्या संविधानाचे,राज्यघटनेचे, सामान्यांचे दिन-दलितांचे समर्थपणे रक्षण करू शकतो. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सध्याच्या राजकारणामुळे फाटाफूट झालेली आहे जनतेमध्ये अस्वस्थता दिसत आहे, कार्यकर्त्यांची मती गुंग झाली आहे ही खरी वस्तुस्थिती आहे.
राज्यात, जिल्ह्यात जी राजकीय अनिश्चितता तीच परिस्थिती वाई तालुक्याची आहे, सुरुवातीपासून काँग्रेस विचारांची पाठराखण करणारा वाई तालुका. कै. लक्ष्मणराव पाटलांच्या कुटुंबाचे राजकारण अस्ताला जात असताना १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली जणूकाही कै.लक्ष्मणराव पाटील यांच्यासाठीच या पक्षाचे निर्मिती झाली की काय असे म्हणावे लागेल, त्या राजकीय परिस्थितीत पाटील कुटुंबियांच्या पदरात भरभरून दान पडले तीच परिस्थिती भोसले कुटुंबीयांची काँग्रेसमध्ये राहून सर्व सत्तांचा पुरेपूर लाभ घेतला श्री प्रतापराव भाऊंचं राजकारण काँग्रेस पक्षातच भहरलं त्यांच्या वारसदारांनी श्री मदन दादांनी २०१४ साली काँग्रेस माझी काळी आई आहे तिचे ऋण विसरणार नाही अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती परंतु २०१९ मध्ये जन्मदात्री आईची उपमा देणाऱ्या काँग्रेसशी त्यांनी प्रतारणा केली, पक्ष सोडला तर श्री शरद पवार साहेबांच्या पुण्याईवर ज्यांचे राजकीय पुनर्वसन झाले त्यांचे वारसदार श्री मकरंद पाटलांनी चार दिवसापूर्वी मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जीवात जीव असेपर्यंत श्री शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही अशी जाहीर शपथ घेतली होती त्याच आमदारांनी काल बापाला अलविदा करून राष्ट्रवादीतील फुटीर गटाशी घरोबा केला अशी शोकांतिका दक्षिणकाशी वाईची झालेली आहे.
‘लेकिन समय बडा बलवान होता है’ संथ वाहणारी कृष्णामाई सर्व काही पाहत आहे, गेली अनेक वर्ष भोसले व पाटील दोन घराणी वाई तालुक्याच्या सत्तास्थानी राहिली आहेत, त्यांच्यामुळे गावागावात गट निर्माण झाले एकमेकांची डोकी फुटली अनेक कार्यकर्त्यांची घरे फुटली ही मंडळी मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी तत्व, विचार वेशीला टांगून, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावून कृतघ्नपने सत्तेच्या दावणीला एकत्रपणे रवंथ करताना दिसणार आहेत, पूर्वी साटयालोट्यातून,आता उघडपणे मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भोसले – पाटील जोडगोळीला अलविदा करण्याची वेळ जवळ येत आहे, जनमानस आतुरतेने त्या मैदानाच्या प्रतीक्षेत आहे असे श्री कल्याण पिसाळ देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळ देशमुख – ओझर्डे
उपाध्यक्ष वाई तालुका काँग्रेस कमिटी
फोन-९८५०४१२९०९