कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज:-दुष्काळी माण -खटाव जनतेच्या वतीने पाण्यासाठी केळीचे वाटप.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दुष्काळी माण -खटाव जनतेच्या वतीने पाण्यासाठी केळीचे वाटप.

 

(अजित जगताप )
वडूज दि: सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून दुष्काळी माण -खटाव भाग आता अतिदुष्काळाने होरपळत आहे. त्यांच्या तहानलेल्या घशामध्ये पाणी ओतावे पण आता आश्वासनाची कानात कांडी टाकून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. त्यामुळे दुष्काळी जनतेने राज्य शासनाकडे पाण्यासाठी केळी वाटपाचा अभिनव कार्यक्रम केला आहे. याची सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू झालेली आहे.
माण -खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या भाजपच्या जोड गोळीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या ती मध्ये भव्य दिव्य आकर्षक कार्यक्रम व बोटिंग कार्यक्रम आंधळी धरणामध्ये केला .
जिहे – कठापूर योजनेतून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार या योजनेतून जलपूजनाचा इव्हेंट केला. याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण, दुष्काळी भागातील जनता शेती व पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी संघर्ष करत आहे. शासकीय पातळीवर लक्ष वेधून घेण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने खटाव तालुक्यातील वंचित गावांना पाणी मिळावे. या प्रमुख मागणीसाठी खटाव तालुक्यातील जनजागृती बैठक सुरू केलेली आहे. या बैठकीला राजकीय मतभेद विसरून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी होत आहे. भुरकवडी, सिद्धेश्वर कुरोली, वाकेश्वर नढवळ, अंबवडे, बनपुरी, वडूज गणेशवाडी, येरळवाडी तसेच माण तालुक्यातही प्रशांत विरकर, संजय भोसले व काही गावातील सरपंच आणि महाविकास आघाडीचे नेतेगण मंडळी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. अनेक ठिकाणी बैठका होत आहेत.
आम्हाला कोणत्याही राजकारणाची गरज नाही. आम्हाला फक्त पाणी मिळावे. यासाठी आम्ही लढा देत आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करून स्वतःला जलनायक पदवी बहाल करून दुष्काळी जनतेची क्रूर चेष्टा होत आहे. वास्तविक पाहता कोणताही फेटा हा सन्मानाचे चिन्ह आहे. परंतु, पैशाची धुंदी व पैशातून सत्ता…. सत्तेतून पैसा हे गणित ज्यांना जमले आहे. ते सोन्याचाही फेटा घालू शकतात. परंतु, त्यांनी तहानलेल्या माणसाला पाणी देऊन माणुसकी जपली पाहिजे. कारण, आता खटाव तालुक्यातील औंध १६ गावे, पेडगाव -कणसेवाडी येथील सोळा गावे व बिदाल ,वारुगड, मार्डी , वाकी त्याचबरोबर माण तालुक्यातील अनेक गावं ही पाण्यापासून वंचित आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
ही बाब शरमेची असून सुद्धा जल पूजन करून आपण कोणते दिवे लावलेत ? हे दिवसा दाखवण्याचा प्रकार सुरू होत आहे. ही खेदाची बाब आहे. अशा शब्दात खटाव तालुका पाणी संघर्ष समितीचे निमंत्रण विजयकुमार शिंदे, येरळवाडीचे धनंजय चव्हाण,डॉ. महेश गुरव, गणेश भोसले, शहाजीराजे गोडसे , संभाजीराजे गोडसे, योगेश जाधव, अंकुश दबडे, सूर्यभान जाधव, अनिल पवार इम्रान बागवान, लखन पवार व आबासाहेब भोसले, संजय जगताप यांच्यासह अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.आमचा राजकारणा कधीही विरोध नव्हता. खरं म्हणजे दुष्काळ हटवण्याचे काम करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे माण- खटावचे माजी आमदार दिवंगत धोंडीराम वाघमारे, दिवंगत सदाशिव पोळ, दिवंगत भाऊसाहेब गुदगे, माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर यांच्यासारख्या लोकसंग्रह असणाऱ्या नेत्यांनी पायाभरणी केली पण दुर्दैवाने अध्यापही त्याचा कळस निर्माण करू शकलो नाही.
ही मतदार म्हणून अनेकांना खंत वाटत आहे. वास्तविक पाहता प्रत्येक आमदार हा विकास कामे करून लोकांच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण करतात पण, काही जण हे बॅनरबाजी, पेपर बाजी व डीजे साऊंड सिस्टिम च्या नादातच आहेत. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती फार भीषण आहे. अजून उन्हाळा आलेला नाही पण, उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका होत असल्याने मतदारांचा खरा कौल माण – खटाव मध्ये दिसून येणार आहे. ही बाब राज्यकर्त्यांनी विसरू नये. शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे. या मागणीसाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने केळी वाटून जनतेला पाणी देण्याची मागणी करा असा संकेत दिलेला आहे. काहींनी तर चक्क केळ खाऊन आंधळे धरणामध्ये साले टाकण्याचा पराक्रम केलेला आहे. त्याची ही चर्चा विनोदी शैलीने होत आहे. खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी जलपूजनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना आत्मचिंतन करा. उपाशी असाल तरी केळी खा व तिथे जाऊन पाणी मागा. अशी अभिनव मागणी मागणी करा. असा सल्ला दिला होता. यामुळे या कार्यक्रमाला जाणाऱ्या काहींनी आपल्या गाड्या माघारी वळवून मागणीला पाठिंबा दिला आहे.आणि आपल्या खटाव तालुक्याचा स्वाभिमान कायम केला. त्यांचे डॉ. महेश गुरव व धनंजय चव्हाण यांनी मनापासून आभार मानले आहेत.
———————-&———————-

फोटो-आंधळी धरणातील जलपूजनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना केळ वाटप करताना संघर्ष समितीचे कार्यकर्ते (छाया- निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button