सातारा:-प्रचार यंत्रणा राबवून स्वतःला मतदान न करणारे ३२ उमेदवार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
प्रचार यंत्रणा राबवून स्वतःला मतदान न करणारे ३२ उमेदवार.
सातारा दि: विधानसभेच्या निवडणुका या राज्याच्या प्रश्नांवर लढवल्या जातात. परंतु स्थानिक पातळीवर भूमिपुत्र व बाहेरील उमेदवार असा जो प्रचार झाला होता. तरी ही ३२ मतदार संघामध्ये आता स्वतः उमेदवार स्वतःला मतदान करू शकत नाही. ही बाब समोर आलेली आहे.
स्थानिक नेतृत्व उभे करण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांना यश मिळाले आहे. परंतु ,महायुतीने सर्वाधिक मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवारी दिल्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून अनेकांनी दक्षिण ऐवजी पश्चिम ग्रामीण ऐवजी शहर असा मतदार संघ निवडलेला आहे. यामध्ये चार मंत्री ११ आजी माजी खासदार – आमदार व १७ प्रतिष्ठित उमेदवार आहेत.
विशेष बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी दिली पण त्या ठिकाणी भाजप समर्थकाचा शिरकाव झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, आदिती सुनील तटकरे, मिलिंद देवरा, रोहित पवार नबाब मलिक, हिना गावित, निलेश नारायण राणे, धीरज विलासराव देशमुख ,इम्तियाज जलील, संतोष बांगर अभिजीत अडसूळ, गोपीचंद पडळकर, वैभव नाईक, सुभाष देशमुख अशा अनेक दिग्गजांनी आपला पूर्वीचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या शेजारील मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळवलेले आहे.
एकेकाळी स्वपक्षातीलच काही लोक स्थानिक भूमिपुत्र असा उल्लेख करून मत मागत असतात . सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात चक्क बॅनरबाजी करून भूमिपुत्र हा महायुतीचे उमेदवाराबाबत प्रचाराचा खरा मुद्दा बनवला होता. त्याच पक्षातील काहीं उमेदवारांनी स्थानिकांवर अतिक्रमण केलेले आहे. याबाबत त्यांची भूमिका काय आहे? असा त्यावेळी प्रश्न विचारला जात होता.
आज मतमोजणीच्या आदल्या दिवशी अनेक जणांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये मतदान करून विजय मुद्रा दाखवत आहेत.पण या ३२ उमेदवारांना आपल्यासाठी मतदान करता आलेले नाही. हे आता स्पष्ट झालेले आहे. निकाल लागण्यासाठी ४८ तासाचा अवधी असून या ३२ मतदार संघामध्ये मतदार या उमेदवारांना विजयी करतात की स्थानिकांना प्राधान्य देतात. हे आता मतदान पेटी मध्ये बंदिस्त झालेले आहे. वास्तविक पाहता महाविकास आघाडी व महायुतीच्या निवडणुकीत अनेकांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज दाखल केलेआहेत . तरी या निवडणुकीत त्यांचा फारसा प्रभाव दिसून येणार नाही. हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे खऱ्या अर्थाने योग्य उमेदवार निवडून येण्याची चिन्ह दिसू लागलेले आहेत.