खटाव:-मायणी तलाव आता पूर्ण क्षमतेने भरणार व बळीराजा सुखावणार.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी तलाव आता पूर्ण क्षमतेने भरणार व बळीराजा सुखावणार.
मायणी प्रतिनिधी__ब्रिटिश कालीन मायणी तलाव हा उन्हाळ्यात पूर्ण कोरडा राहत असे आणि या परिसराला कायम पिण्यासाठी टँकर मागवावा लागत असे याची जाणीव माजी आमदार दिलीपराव येळगावकर यांना झाल्याने त्यांनी त्याकाळच्या युती सरकारच्या काळात खास बाब म्हणून सोळा गावासाठी टेंभू योजना पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर करून घेतली व दोन वर्षात ही योजना पूर्ण देखील झाली तलावात पाणी आले चांद नदी वाहत राहिल्याने पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु भिकवडी ते मायणी हे पाणी उघड्यावरून येत असल्याने भिकवडीतील काही शेतकऱ्यांनी बांध घालून पाणी आपल्या शेताकडे वळवले परिणामी मायणी तलाव व नदी कोरडी होऊ लागली याची जाणीव माजी आमदार येळगावकर यांना होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार व प्रांत विटा यांना समक्ष जाऊन परिस्थिती समजावून सांगितली तसेच वाहत्या पाण्यावर अतिक्रमण केलेले मातीचे बंधारे हटवण्याबाबत विनंती केली या मातीच्या बंधार्यामुळे पाण्याचा प्रवाह खूपच मंदावला होता आता त्यांनी शासनाच्या आदेशाची वाट न पाहता मायणी , चितळी, विखळे, कान कात्रे, शेडगेवाडी, येथील युवा कार्यकर्त्यांनी डॉक्टर येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमित झालेले बंधारे हटवून पाण्याला वाट करून दिली आता लवकरच मायणी तलाव भरेल व चांद नदी वाहती राहील व उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही याची खात्री वाटू लागल्याने ग्रामस्थात समाधानाचे वातावरण पसरले आहे.