वाई:-भविष्यामध्ये किसन वीर महाविद्यालय विद्यापीठ होणार हे निश्चित. – श्री यशेंद्र क्षीरसागर
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215
वाई दि .4
भविष्यामध्ये किसन वीर महाविद्यालय विद्यापीठ होणार हे निश्चित. – श्री यशेंद्र क्षीरसागर
किसन वीर मध्ये कृष्णाई अंकाचे प्रकाशन संपन्न
वाई: कृष्णाई हा वार्षिक अंक महाविद्यालयाच्या विद्यार्थी लेखकांनी विविध विषयांवर केलेल्या दर्जेदार लेखन साहित्याचे व त्यांच्या सुबक कलाकृतीचे भांडार आहे. यातून त्यांच्या ज्ञानाची शिक्षणाची आणि समजाची भूक किती मोठी आहे याची प्रचिती येते. असे गौरवउदगार प्रसिद्ध लेखक व सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री यशेंद्र क्षीरसागर यांनी काढले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या कृष्णाई २०२२-२३ या वार्षिक नियतकालिकेच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ, गुरुनाथ फगरे, कार्यकारी संपादक डॉ. बाळकृष्ण मागाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे क्षीरसागर म्हणाले, समाजसेवक व समाजसुधारक यांचे महत्त्व आजच्या तरुणांमध्ये जाणवत नाही. कमी वयात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा, भगतसिंग यांनी दिलेले योगदान अनमोल आहे. त्याचा विसर पडता कामा नये. त्यासाठी विज्ञानाची व्यवहारकता व कलेची संवेदनशीलता यांचा संगम घडविण्याची गरज आहे. हा सुमध्य कृष्णाईच्या लेखन साहित्यातून साधला आहे. अशा प्रकारच्या विविध अंगी विचारांना व्यक्त होण्याचे मुक्त व्यासपीठ खुले असेल आणि येथील प्रत्येकाची दृष्टी विशाल असेल तर भविष्यामध्ये किसन वीर महाविद्यालय विद्यापीठ होणारे हे निश्चित.
मदनदादा भोसले म्हणाले, संपूर्ण जग २०२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करत असताना आपल्या कृष्णाई अंकाची त्याविषयीची मांडलेली मुखपृष्ठ संकल्पना स्तुत्य आहे. भारतीय संस्कृतीमधील आहाराविषयी जुन्या सत्वांना व तत्वांना त्यांनी उजाळा दिला. फास्ट फूडच्या विळख्यात अडकलेल्या विशेषत: आजच्या तरुण पिढीला धान्याच्या सात्विकतेचे आरोग्यदायी महत्त्व पटेल आणि ती स्वतः शारीरिक व मानसिकरित्या सक्षम होऊन पुढील पिढीस त्याप्रमाणे मजबूत करण्यास हातभार लावतील अशी अपेक्षा आहे.
संपादक प्राचार्य गुरुनाथ फगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यकारी संपादक डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी कृष्णाई अंतरंगाविषयी मांडणी केली तर डॉ. शिवाजी कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन श्री. गणेश चव्हाण यांनी केले व श्री. बाळासाहेब कोकरे यांनी आभार मानले. हा कृष्णाई अंक दर्जेदार व माहितीपूर्ण करण्यासाठी सहसंपादक डॉ. धनंजय निंबाळकर डॉ. शिवाजी कांबळे डॉ. राहुल वळीव, दिपाली चव्हाण, दिक्षा मोरे, अशोक जमदाडे यांच्याबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आकाश धुमाळ यांनी कठीन परिश्रम घेतले.