श्रीरामपुर जिल्हा न झाल्यास निवडणुकावर बहिष्कार टाकणार कृती समितीचा इशारा.
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर
श्रीरामपुर जिल्हा न झाल्यास निवडणुकावर बहिष्कार टाकणार कृती समितीचा इशारा.
श्रीरामपुर Rps स्टार न्युज प्रतिनिधी श्रीरामपुर हेच नवीन जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे ‘ जर श्रीरामपुर जिल्हा केला नाही . तर सर्व श्रीरामपुची जनता विधानसभा व लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकेल असा इशारा स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला . श्रीरामपुर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी जिल्हा कृती समितीची बैठक अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी आयोजित केली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे मनसेचे बाबा शिंदे . भीमशक्तीचे संदिप मगर . श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये . राजेद्र सोनवणे . आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल व्यापरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहुल नगरकर . शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण पाटील . सलीमखान पठाण . लहुजी सेनेचे हनिफ पठान आदी उपस्थित होते कांबळे म्हणाले . की श्रीरामपुर जिल्हाच्या प्रश्न महत्वाचा आहे सर्वांनी मनात कुठले राजकारण ठेवता मनाचा मोठेपणा करून नेत्यांची भेट घ्यावी . या प्रश्नावर आपन जनतेला रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाहु असे ते म्हणाले . प्राप्रसंगी बाबा शिंदे म्हणाले . कि श्रीरामपुर जिल्हा होण्यासाठी मोठे चळवळ उभारली पाहिजे . सर्वांना बरोबर घेतले पाहिजे तरच ही चळवळ यशस्वी होईल . असे ते म्हणाले आगे यांनी श्रीरामपुर च्या पाण्याचा प्रश्न जितका महत्वाचा तितकाच श्रीरामपुर जिल्हाचा प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगितले श्रीरामपुर जिल्हाचा प्रश्न सुटावा म्हणून सर्व आजी माजी नेत्यांनी भेट घेण्याचे बैठकीत ठरले.