ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-भाजप कार्यकर्ते पदापेक्षा विचारांना प्राधान्य देतात- केशव उपाध्ये.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

भाजप कार्यकर्ते पदापेक्षा विचारांना प्राधान्य देतात- केशव उपाध्ये.

 

सातारा (प्रतिनिधी): सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाराष्ट्रात दुही व अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. परंतु, निष्ठावंत भाजप कार्यकर्ते पदापेक्षा विचारांना प्राधान्य देतात असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीकडून काल जोडे मारो आंदोलन झाले परंतु, राज्यातील जनताच आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षांना मतदान प्रक्रियेतून उत्तर देणार आहेत. मालवणची घटना दुर्दैवी आहेच. या घटनेचे समर्थन कुणीच करणार नाही. परंतु, त्या निमित्ताने ‘मविआ’तील तिन्ही पक्षांकडून सुरू असलेले राजकारणही गलिच्छ आणि संतापजनक आहे. काही दिवसांपासूनचे विरोधकांचे वर्तन महाराष्ट्रात दुही व असंतोषाचे वातावरण निर्माण करीत आहेत.

छत्रपती शिवरायांची सुरतेवरील स्वारी ही लूट नव्हती, तर ती स्वराज्य विजयाची मोहीम होती. ज्याप्रमाणे १८५७चे स्वातंत्र्य समर होते . ते बंड नसून स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते, त्याचप्रमाणे शिवरायांची सुरतेवरील स्वारीही लुटीसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी होती. कारण, लुटीच्या वेळी सरसकट सगळे लुटले जाते. पण, महाराजांनी त्यावेळी अनेकांना उदारपणे अभय दिले होते आणि त्यांचे संरक्षण केले होते. १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याला स्वातंत्र्यसमर न मानता बंड समजणे, हा इंग्रजांचा वसाहतवादी दृष्टिकोन होता.

मालवण येथील शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी पुरेशी नसेल तर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी शिवरायांविषयी अनुद्गार काढून माफी मागितली होती. मग ‘मविआ’ कुठले जोडे मारो आंदोलन करणार? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांची सार्वत्रिक कत्तल झाल्याप्रकरणी सोनिया गांधींनी शीख समुदायाची माफी मागितली होती. जर ही माफी पुरेशी नसेल तर त्यांच्याविरोधात कोणते आंदोलन करणार? प्रत्यक्षात या आघाडीतील तिन्ही पक्षांचे शिवप्रेम बेगडी आहे. कारण, ते असते तर शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर वर्षानुवर्षे झालेल्या अतिक्रमणांकडे यांनी दुर्लक्ष केले नसते. असेही श्री उपाध्ये यांनी पत्रकारांना सांगितले यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविता, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, भाजप सातारा जिल्हा क्रीडा आघाडी प्रमुख हेमंत शिंदे व शहराध्यक्ष विकास गोसावी आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button