ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता – नांदूर्खी बु.गावात मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी ठराव व्हावा यासाठी ग्रामपंचायतला लेखी निवेदन.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
राहाता प्रतिनिधि– राहाता तालुक्यातील नांदूर्खी बु.गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत आज दि.३०/१०/२०२३ रोजी ग्रामपंचायत नांदूर्खी बु.कार्यालयात गावचे सरपंच यांना लेखी निवेदन देत मागणी केली कि जोपर्यंत महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षण जाहीर करत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतने नेत्यांना गावबंदीचा तात्काळ ठराव करावा व त्याची त्वरित अंमलबजावणी करून गावात आरक्षण नाही तोपर्यंत पाय ठेऊन देणार नाही असा चौकात बोर्ड लावण्यात यावा अशा प्रकारचे आज निवेदन देण्यात आले.या देताना गावातील श्री.तुषार चौधरी,श्री वसंत काळे,श्री.अमोल चौधरी,श्री. संदीप वाकचौरे,श्री रोहन चौधरी,श्री.प्रदोष चौधरी व कल्याण चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.