ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

दहिवडी:-माण -खटावच्या परिवर्तनाच्या लढाईत शेखर भाऊ गोरे यशस्वी ठरणार ,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
माण -खटावच्या परिवर्तनाच्या लढाईत शेखर भाऊ गोरे यशस्वी ठरणार ,,,

दहिवडी दि: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निष्ठावंतांचे खच्चीकरण व संधीसाधूना मानाचे स्थान. अशी एक नवीन राजकीय रचना निर्माण झालेले आहे. या राजकीय रचनेला छेद देण्यासाठी माण -खटावचे सुपुत्र व शिवसेना संपर्कप्रमुख व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे हे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये हिरो ठरतील. त्यांना समर्थ साथ लाभली तर माण – खटावच्या परिवर्तनाच्या लढाईत युवा नेते शेखर भाऊ गोरे यशस्वी ठरतील. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
युवकांचे आयडॉल शेखर भाऊ गोरे यांनी वीस वर्षांपूर्वी समाजकारणातून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती .एवढेच नव्हे तर वरिष्ठ नेते सदाशिवराव पोळ हे ठरवतील ते आमदार अशी परिस्थिती माण मतदारसंघात असताना शेखर भाऊ गोरे यांनी आपले बंधू जयकुमार गोरे यांना समर्थ साथ दिली. आणि माण -खटावच्या दुष्काळी भागात पुन्हा एकदा गोरे बंधू पर्व सुरू झाले. हे आता लपून राहिलेले नाही.
अपक्ष, राष्ट्रीय काँग्रेस व भाजप असा आ .जयकुमार गोरे यांचा प्रवास असला तरी सुरुवातीचे पाच वर्षे वगळता शेखर भाऊ गोरे यांनी त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आ .गोरे बंधूंमध्ये राजकीय कलगीतुरा होत असताना प्रामाणिकपणे एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले गोरे बंधू आज खूप मोठ्या उंचीवर पोहोचलेले आहेत. यामध्ये त्यांची व्यक्तिगत परिश्रम ,कष्ट, त्याग व निस्वार्थी भावना याला सुद्धा किंमत आहे .
खऱ्या अर्थाने पाहता आ.जयकुमार गोरे यांच्यापेक्षाही समाजकारणामध्ये दिलदार वृत्ती व सामान्य माणसांसाठी धावून जाणारे नेते म्हणून शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे सर्व परिचित आहेत. त्यांनी सत्तेच्या माध्यमातून माण खटावला पाणी मिळावे .या एकाच हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता .पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हातामध्ये हिरा असून सुद्धा त्याची पारख करता आली नाही. त्याचे शल्य आजही माण – खटाव वासियांना अस्वस्थ करत आहे.
माण -खटावच्या खेड्यापाड्यातील व वाड्या वस्तीतील लोकांना राजकारणाचे काही देणे घेणे नाही.जो नेता आपल्या सुखदुःखामध्ये धावून येईल. आपला पाणी प्रश्न सोडवेल .त्याच्या पाठीशी ठाम राहताना कधीही माण खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदार म्हणून लोकांनी अपेक्षा ठेवली नव्हती. आज अपेक्षांची पूर्तता करणारे निवडणुकीत निवडून येतात. काहीजण आपली दुकानदारी अबाधित राहावी म्हणून आजही राजकीय नेत्यांना मॅनेज होतात .आपली सहकारातील पक्कड अधिक घट्ट करण्यामध्येच स्वतःला सिद्ध करून दाखवत आहे. त्यामुळे आजही अनेकांची आमदारकीची स्वप्न ही स्वप्नच राहिलेले आहेत. ती कदापिही पूर्ण होणार नाही. असे लोक छातीठोक पणाने सांगत आहेत.
भाजप आ . जयकुमार गोरे यांना जर खरोखर मनापासून पराभूत करायचं असेल तर विरोधकांनी मताची विभागणी टाळली पाहिजे. हे त्रिवार सत्य आहे. पण, निवडणुकीमध्ये शत्रूशी हात मिळवणी करून आपला राजकीय स्वार्थ साधने म्हणजे निवडणूक लढवणे .असं काहींना वाटत आहे. त्यामुळेच तर आमदार जयकुमार गोरे यांनी हॅट्रिक केलेले आहे. यामध्ये विकास कामे, मॅनेजमेंट व निवडणुकीच्या अनुषंगाने आश्वासनाची खैरात याची सुद्धा हॅट्रिकच आहे. हे विसरता येणार नाही.
सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या शिवसेनेला किमान महाराष्ट्रात ७५ ते १०० जागा मिळतील. अशी तयारी शिवसेनेने केलेली आहे. सध्या राजकारणामध्ये विश्वासार्हता तसेच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नेते ही शेखर भाऊ गोरे यांची ओळख आहे. त्याचा फायदा आगामी निवडणुकीत होईल. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
माण -खटाव मध्ये नेहमीच पाण्याचे राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम येथील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पण, सर्व सत्ता असूनही माण खटावच्या ४६ गावे व ३२४ वाड्यावर त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर द्यावे लागत आहेत .आणि एवढं होऊन सुद्धा आमदारचा उल्लेख काही भक्तगण जलनायक असा करीत आहेत.वास्तविक ते जलनायक नसून पाण्याअभावी कोरडनायक असेच महाराष्ट्रात त्यांची खरी ओळख आहे . जे काही जण लपवून ठेवत आहे.जे कठापूर योजनेसाठी आपल्या प्रयत्नातून निधी दिल्याची वल्गना करणारे फक्त भाषणातूनच विकासाच्या गप्पा मारतात. आता मात्र त्यांना जनता जाब विचारत आहे. हे सुद्धा परिवर्तन चक्र मानले जात आहे.
चारा छावणीची मागणी करणे. त्यानंतर पुन्हा मंत्री महोदयांकडे बसून चारा छावणीचे पैसे रखडवणे अशी भूमिका काही जण घेत आहेत. हे सुद्धा उघड झालेले आहे . शिवसेनेचे युवा नेते शेखर भाऊ गोरे यांनी कर्तबगारीवर सातारा जिल्हा बँकेचे संचालक पद मिळवून दाखवले आहे. त्यांच्या रूपानेच माण – खटाव मध्ये महा विकास आघाडीला आमदारकी लाभणार आहे. आतापर्यंत सामाजिक कार्यातून शेखर भाऊ गोरे यांनी जनतेशी संपर्क ठेवून सामाजिक कार्याची नाळ जतन केली आहे. या ढाण्या वाघाला विधानसभेत प्रवेश देण्यासाठी आता अस्मिता म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिल्यास खऱ्या अर्थाने माण – खटावच्या दुष्काळी भागात निसर्गाचे ही वरदान लाभेल असे आता जुने जाणते कार्यकर्ते मत व्यक्त करत आहे. राजकारणामध्ये विरोधक असावा पण शत्रू नसावा. ही शिकवण शेखर भाऊ गोरे यांनी खेड्यापाड्यात रुजवली आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने राजकीय संघर्ष असूनही माण – खटाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. हे आता शांततामय वातावरणामुळे अधोरेखित झाले आहे .त्याला मूठ माती देण्याचे काम भाजप व राष्ट्रवादी मधील ट्रिपल इंजिनचे काही समर्थक करत आहेत. हे अशोभनीय आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांनी अनेक तरुणांना राजकारणात संधी देऊन मोठे केले आहे .आज अजूनही युवा नेते शेखर भाऊ गोरे यांच्यासारखा लढाऊ योद्धा माण खटाव मध्ये पुन्हा गत वैभव आणून देऊ शकतो. यासाठी मोठ्या मनाने जेष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेसच्या अभ्यासू व निधर्मी नेत्यांनी प्रामाणिकपणाने युवा नेते शेखर भाऊ गोरे यांच्या राजकीय शक्तीला साथ द्यावी. माण -खटाव च्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवावा. असा आता सर्वत्र सूर उमठत आहे.

——————–&————————————
फोटो – शेखर भाऊ गोरे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button