ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-नेत्यांचे मिटले पण कार्यकर्त्यांची हौस फिटली.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

नेत्यांचे मिटले पण कार्यकर्त्यांची हौस फिटली.

सातारा दि: सध्या राजकीय पक्षांमध्ये निष्ठा व तत्वज्ञान खुंटीला ठेवून पळा रे पळा लवकर दुसऱ्या पक्षात पळा. अशी धावण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनात खदखद निर्माण झाली आहे . राजकीय पक्षांच्या नेत्यांची मिटले पण, सामान्य कार्यकर्त्याची चांगलीच हौस फिटली असल्याचे बोलले जात आहे.
थोडक्यात काही बुडत्या जहाजातून बाहेर पडून बांधावर उभ्या असलेल्या भाजपच्या जहाजावर जाण्यासाठी अनेकजण उत्सुक असले तरी आणखीन समुद्रात एखादं चांगलं जहाज आले की, त्यामध्ये उडी मारण्यासाठी सुद्धा काही कार्यकर्ते सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये पूर्वी गावोगावी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थां, सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांचे फोटो छापून निवडणूक लढवल्या जात होत्या. एकमेकांच्या विरोधी पक्ष बद्दल अपशब्द वापरले जात होते. आला रे आला,,, कोण आला ?आता कसं वाटतंय. ,,,,, येऊन येऊन येणार कोण? अशा घोषणा देऊन पक्षाच्या नेत्यावर स्तुती सुमने वाहिली जात होती. आता राजकीय दृष्ट्या नेत्यांचे मिटले पण कार्यकर्त्यांची हौस फिटली असे चित्र निर्माण झालेले आहे.
१९९साली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती केली. त्यावेळी स्वतंत्र सैनिक व काँगेस पक्षाचे नेते वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला हा इतिहास विसरून विद्वान डॉ शालिनीताई पाटील यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर कोरेगाव मतदारसंघात दोन वेळा आमदार की भोगली होती.
त्या पाठीमागे राजकारण पाहिले असता १९७८साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच पुरोगामी लोकशाही आघाडीचे प्रयोग करून खऱ्या अर्थाने राजकीय पक्षातील एक गट बाहेर पडण्याचा प्रयोग सुरू केला. त्यानंतर शिवसेनेचे छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, भारिप बहुजन महासंघाचे मखाराम पवार, डॉ नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे, किनवटचे भिमराव केराम, , रिपब्लिकन ऐक्यचे रामदास आठवले, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत अशा अनेकांनी पक्ष बदलला. त्याचबरोबर काँग्रेस पक्षातील ही काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव मदन भोसले, हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री अभयसिंह भोसले यांचे चिरंजीव आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच खासदार उदयनराजे भोसले,आ .जयकुमार गोरे, माजी खासदार नाना पटोले, संभाजी पवार अशा अनेकांनी आपली पक्षनिष्ठा ही विकास कामासाठी बाजूला करत मतदारांच्या विकास व्हावा. म्हणून पक्ष बदल केला. आता त्याच पक्षातील काही लोक भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे राजकारणातील सर्व समीकरण बदलून गेलेले आहेत.
सध्या पेरल ते उगवते या न्यायाप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी सत्ता सुंदरी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची गळ व कळ चिप्पी झाली होती .अनेक नवख्या व घराणेशाही चा पुरस्कृत करणाऱ्या अनेकांना संधी दिली. राजघराणे व सदन तेजोमय लोकांना संधी देण्यात कोणतीही कुचराई केली नव्हती.पण ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आपलं आयुष्य घालवले. त्यांनी मात्र कधीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नाही .ही कौतुकस्पद बाब असली तरी त्यांच्या दृष्टीला आता कोणी किंमत देत नाही. हे पण आता त्रिवार सत्य उघडकीस आले आहे.
पूर्वी सामाजिक बांधिलकी, वैचारिक बैठक व पक्ष नेत्याबद्दल असलेली निष्ठा कार्यकर्त्याची राजकीय बाग फुलत होती. आता जिकडे चांगली बाग तिथेच वृक्षारोपण करून काही नेते सत्तेचा सुगंध घेण्यामध्ये तरबेज झालेले आहेत. यामध्ये आता बदलत्या भूमिकेबाबत वातावरणामध्ये जसे बदल होतील तशा पद्धतीने प्रसार माध्यमातील बदल दिसू लागलेली आहेत. मनसे सारख्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर या पक्षाचे धुरा अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली. पण त्याचे रूपांतर मतांमध्ये होऊ शकलेले नाही. तीच परिस्थिती रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, समाजवादी पक्ष, एम आय एम या पक्षाची झाली आहे. सध्या येऊ नको तर कुठल्या डब्यात बसू,,, अशी अवस्था तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समाज पक्षाची झालेली आहे. कारण त्यांनी दमदार आगमन केले पण स्वागतापूर्वीच राजकीय बदल घडल्यामुळे त्याची फारशी आता दखल घेतली जात नाही .तसेच अवस्था वंचित बहुजन आघाडीची पाहण्यास मिळत आहे. वास्तविक पाहता ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर निवडणूक लढवल्या जातात. त्या कार्यकर्त्याची मात्र चांगलीच जिरली आहे. त्यांची राजकीय दृष्ट्या संवेदनशील हौस फिटली आहे.
नको रे बाबा राजकारण अशी म्हणण्याची पाळी तरुण तडफदार व युवकांमध्ये निर्माण झाली आहे .त्यामुळे आता राजकारण करण्यापेक्षा आपल्या घरातील व नातेवाईक मंडळींच्या विकासासाठी वेळ देणे गरजेचे आहे. याची आता खात्री पटली असल्याने या राजकीय मंडळीला आता चांगल्या विचाराला अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे. हे परिवर्तन कायमचे टिकून रहावे हीच अपेक्षा जेष्ठ नागरिक करीत आहेत.

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button