खटाव:-वडूज येथील पुरवठा शाखेकडून माहिती अधिकाऱ्याची पायमल्ली होत असल्याची जनता दरबारात तक्रार.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION- राष्ट्रीय अध्यक्ष संपादक चव्हाण:-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
वडूज येथील पुरवठा शाखेकडून माहिती अधिकाऱ्याची पायमल्ली होत असल्याची जनता दरबारात तक्रार.
वडूज दि: दरजाई ता. खटाव येथील युवा कार्यकर्ते राहुल कदम यांनी सरकारमान्य शिधा वाटप कॅश मेमो, साठा नोंदणी वही व विक्री नोंदणी नक्कल मिळणे बाबत मार्च महिन्यामध्ये लेखी माहितीच्या अधिकारात मागणी केली होती. त्याबाबत अद्यापही माहिती न मिळाल्यामुळे राहुल कदम यांनी थेट वडूज जनता दरबारात प्रांताधिकारी उज्वला गाडेकर व तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडे पुन्हा एकदा स्मरण पत्र देऊन माहिती अधिकाराची पायमल्ली होत असल्याची तक्रार केलेली आहे .यामुळे खळबळ मा जली आहे.
याबाबत माहिती अशी की दरजाई या गावात सरकार मान्य शिधा वाटप दुकान असून सदरच्या दुकानाबाबत अनेकदा वारंवार तक्रारी करूनही त्याची गंभीर दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या श्री राहुल कदम यांनी अखेर माहितीचा अधिकार वापरून महा एप्रिल २०१८ ते महा फेब्रुवारी २०२३ झालेल्या नियमित धान्य वाटपाचे कॅश मेमो व इतर कागदपत्राची नक्कल मिळणे बाबत रीतसर माहिती अधिकाराचा अर्ज दिला होता. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अधिनियम २२ सन २००५कलम चा / १ प्रमाणे कारवाईच्या अर्जात सादर करून त्याची पोच घेतली होती. या गोष्टीला अडीच महिने होऊन अध्यापही खटाव तहसील कार्यालय व पुरवठा शाखेने कोणतीही दखल घेतली नाही. उलट हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब सन्माननीय आमदार महेश शिंदे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात मानण्यासाठी आज राहुल कदम व ग्रामस्थ आले होते. परंतु ,अचानक आ. शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे ते निघून जाताच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अधिकारी वर्गाकडे निवेदन सादर केले.
महाराष्ट्र मध्ये यापूर्वी माहितीच्या अधिकाराचा कायद्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याला खटाव तालुका अपवाद आहे का? किंवा माहितीच्या अधिकारातून खटाव तालुका वगळावा असेही उपरोधात्मक राहुल कदम यांनी सांगितले. दरम्यान,कोरेगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी खटाव पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारला मोठ्या प्रमाणात खटाव तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, तहसीलदार किरण जमदाडे व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.या जनता दरबारला उदंड प्रतिसाद लाभत असतानाच आमदार महेश शिंदे यांना उभे राहणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विषबाधा झाल्याचे सांगितले.
आ शिंदे हे जनता दरबार सोडून अचानक निघून गेल्याने अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी मान्यवरांनी मार्गस्थ होण्यातच धन्यता मानली. मात्र, वरिष्ठ पातळीवर अधिकारी थांबले होते. त्यामुळे गोंधळात सुरू झालेला जनता दरबार म्हणजे तक्रारीचा अर्ज स्विकारण्याची पाळी काहींवर आली होती. ठोस आश्वासन किंवा कार्य वाही होऊ शकली नाही. जनता दरबारातील मूळ प्रश्न सोडवण्यासाठी अपयश आले. अशी चर्चा रंगू लागली आहे.
___________________________________
फोटो – वडूज येथील जनता दरबार मध्ये निवेदन देताना दरजाई येथील श्री राहुल कदम व झालेली गर्दी,,