अहमदनगर:-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गुंडेगावातील बळीराजाला आश्वासनांचा पाऊस; हातात मात्र फुटकी कवडी …..
प्रतिनिधी अतुल भापकर अहमदनगर:-9607009988

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अतुल भापकर अहमदनगर
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गुंडेगावातील बळीराजाला आश्वासनांचा पाऊस; हातात मात्र फुटकी कवडी …..
नगर तालुक्यातील गुंडेगाव सह अनेक गावांत मागिल वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे गुंडेगाव परीसरात २८०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते, कांदा , सोयाबीन सारखे पिके अक्षरशः पाण्यात वाहून गेली होती गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. उराशी बाळगलेले हिरवे स्वप्न धुळीस मिळाले होते. नगर तालुका तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अनेक डझनभर अधिकारी, बडे राजकीय पुढारी, कार्यकर्ते गुंडेगावात दाखल झाले फोटो टेशन जोरात झाले वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात दखल घेऊन प्रसिद्धी दिली . तत्कालीन तहसीलदार यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले पण कोणत्याही अधिकारी व राजकीय पुढारी यांनी नुकसानभरपाई किती व कधी मिळेल याचा खुलासा कोणीही केला नाही. त्यावेळी लाखो रुपये खर्च केलेले भांडवल वाया गेले होते. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्न बुडाले होते. मात्र भोळे भाबडे माय माऊली शेतकरी नुकसान भरपाई ची वाट पाहतोय, नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता मावळली असतानाच कापूस व कांद्याचे भाव कमी झाल्याने यावर्षी मात्र गुंडेगावातील शेतकरी मात्र कोलमडून गेला आहे. निवडणुका जवळ आल्या की मतांची भीक मागणारी मंडळी या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी कोठेच दिसली नाही . अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिवृष्टी गारपीट असो की नसो पगार मात्र चालूच आहे फक्त बळीराजाला कोणीच वाली नाही, हे सिद्ध झाले आहे , पुढील काळात आपणच हिंमतीने उभं राहून संकटांना सामोरे जावुन खंबीर पणे संकटांना तोंड देण्याची आवश्यकता आहे.