ताज्या घडामोडी

वाई:-पुस्तके वाचनाच्या सवयीमुळे सुजान विद्यार्थी व नागरिक घडतात: डॉ. बाबासाहेब कांगुणे

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि. 10
पुस्तके वाचनाच्या सवयीमुळे सुजान विद्यार्थी व नागरिक घडतात: डॉ. बाबासाहेब कांगुणे

 

पुस्तक वाचनाने मानवी मूल्यांचे धडे मिळतात. वाचनाने वैचारिक प्रगल्भता वाढते. वाचन संस्कृतीने चांगला समाज निर्माण होऊ शकतो. वाचन संस्कृती वृद्धिंगत झाल्यास समाजात शांतता प्रस्थापित होते. असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील इंग्रजी विभागातील सहा. प्राध्यापक डॉ. बाबासाहेब कांगुणे यांनी केले. येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेत ‘वाचन कौशल्य’ या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, श्री. भिमराव पटकुरे, श्री. बाळासाहेब कोकरे तसेच प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. भानुदास आगेडकर, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, डॉ. अंबादास सकट, डॉ. धनंजय निंबाळकर, श्री. राजेंद्र जायकर यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब कांगुणे पुढे म्हणाले की, आपण वेगवेगळ्या उद्देशांसाठी नियमित वाचन करत असतो. वाचन ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. वाचन संस्कृतीच समाजात बदल घडवून आणू शकते. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, थॉमस पेन, बुकर टी वॉशिंग्टन आदींची चरित्रे वाचावीत.
अध्यक्षस्थानावरून बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, वाचन हे जीवन आहे. वाचनाने माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहचतो. आपण माहिती मिळवणे, अभ्यास, मनोरंजन व इतर कारणांसाठी वाचन करत असतो. नियमित वाचनाने आपल्या जिवनास योग्य दिशा मिळते. पुस्तके वाचून आपण चांगले विद्यार्थी घडवू शकतो. पुस्तके वाचल्याने आपणास प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी थोर समाजसुधारक, महापुरुषांची चरित्रे वाचावीत. सर्वांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजक व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी प्रास्ताविकात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचा उद्देश सांगितला व वाचन वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याची माहिती विशद केली. तसेच साहित्य वाचनाने ज्ञान वृद्धिंगत होते असे सांगितले.
सूत्रसंचालन श्रीमती रेशमाबानो मुलाणी यांनी केले, प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री. जयवंत खोत यांनी करून दिली. तर डॉ. शिवाजी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संतोष मुळीक, श्रीमती सुलभा घोरपडे, श्री. भानुदास चौधरी, श्री. किशोर पिसाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button