मसूर :-आज मसूर ता.कराड येथे संवाद यात्रा संपन्न.
प्रतिनिधी सौरभ चव्हाण खटाव :-9503995968

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
आज मसूर ता.कराड येथे संवाद यात्रा संपन्न.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे (भाऊ), कराड-उत्तरचे नेते धैर्यशील कदम (दादा), किसान मोर्चा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रमोद गायकवाड, obc जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, दिपाली खोत, मा.अध्यक्ष सूर्यकांत पडवळ, राजेंद्र चव्हाण, नवीन जगदाळे, जयवंत जगदाळे, सुनील दळवी, बाळासाहेब कांबीरे, सयाजी साळुंखे, नम्रता कुलकर्णी यांचेसह मसूर पंचायत समिती गणातील भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे काम जोमाने चालू आहे. कोरोना काळात जहरी टीका करणारे विरोधक असताना देखील देशात लसीकरण मोहीम यशस्वी करून करोडो लोकांचे प्राण वाचवले गेले. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने महत्वाचा १२०० कोटींचा पालखी मार्ग मोदीजींनी उभारला आहे त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. गावागावात लोकांना घरे मिळावी यासाठी प्रत्येक कुटुंबाला घर देण्यासाठी ग्राउंड लेव्हल वर काम करत करोडो कुटुंबांना मोदींच्या कार्यकाळात घरे मिळाली. केंद्राच्या मदतीने गावोगावी ३०-३२ कोटींचा निधी मिळू लागला आहे. रशिया युक्रेन युद्धात भारताची ताकद जगाला समजली.भारतीय नौदलात छत्रपती शिवरायांना सन्मान देण्याचे ऐतिहासिक कार्य मोदींनी केले असे भाष्य आ.जयकुमार गोरेंनी यावेळी केले.
मोदीजीं मुळे काश्मीर मध्ये तिरंगा ध्वज फडकत आहे. 370 कलम रद्द करून तेथील लोकांना न्याय दिला.
भारतीय जनता पार्टी च्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर पर्यंत ” सेवा पंधरवडा” जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात विविध सेवा उपक्रम राबविले जाणार आहेत. या अंतर्गत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पंचायत समिती गण नुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, मुद्रा योजना, स्वच्छ भारत योजना, उज्ज्वला योजना, जल ही जीवन अभियान या योजनेतून जनतेला झालेला फायदा याची माहिती कराड उत्तर भाजपा नेते श्री. धैर्यशीलदादा कदम यांनी दिली.