श्रीरामपूर:-कर्जबाजारीपणा व सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
कर्जबाजारीपणा व सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ….
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील दिघी येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव मुरलीधर वाणी तंटामुक्ती अध्यक्ष यांचे चिरंजीव कै . बाळासाहेब वसंतराव वाणी यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दि १८ / १२ / २०२३ रोजी सायं ८ .०० वा आत्महत्या केली . त्यांच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रची पाच लाख रुपये थकबाकी होती . त्यांनी इतर नातेवाईकाकडुन काही पैसे जमा करून बँक ऑफ महाराष्ट्र थकबाकी भरलेली होती तसेच खाजगी सावकार व्यक्तीकहुन १५ ते २० टक्क्यापर्यंत व्याजाने रक्कम घेतलेली होती.
त्यातच मागील वर्षी अज्ञात व्यक्तीने त्यांचा दोन ते तीन एकर पिकवलेला हरभरा पेटवून दिला . तसेच सोयाबीन पीकही पावसाअभावी वाया गेले . त्यांच्या पत्नीचा आणि वडिलांना प्यारालिसीसच्या विकारामुळे दवाखान्यात होणारा खर्च अधिक होता . हा सर्व खर्च आणि कर्ज हे उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने या सर्व प्रकारच्या त्रासाला व सावकाराच्या तगाघाला कंटाळुन बाळासाहेब वाणी यांनी आत्महत्या केल्याची नातेवाईकामध्ये चर्चा आहे.