भारताच्या नवनिर्वाचित महामहीम राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्म.
प्रतिनिधी:- अशितोष चव्हाण महाराष्ट्र :-8208717483

व्यक्तीविशेष-
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आज भारताच्या नवनिर्वाचित महामहिम राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली त्यांच्याबद्दल थोडस
श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ साली ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील लहानशा बडिपोसी गावात एका संथाल नावाच्या आदिवासी कुटुंबात झाला.बालपणापासून त्यांना शिक्षणाची आवड होती.त्यांनी सुरूवातीच शिक्षण गावात व नंतर रमाबाई महिला विद्यापीठातून बी.ए (कला शाखेतील पदवी) प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ओडिशामध्ये क्लार्क पदावर कामाची सुरूवात केले नंतर त्यांची पदोन्नती झाली परंतु त्या त्या क्षेत्रात जास्त काळ रमल्या नाहीत.
त्यांनी ती नोकरी सोडून त्यांनी काही काळ प्राथमिक शिक्षिका व नंतर श्री अरबिंदो इंट्रिगल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च सेंटर रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणुन काम केले.
त्यानंतर त्या भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात येऊन राजकारणाशी जोडल्या गेल्या व रायरंगपूर येथील नगरपंचायतींच्या निवडणूकीत निवडून येऊन नगरसेविका झाल्या व त्यांची काम करण्याची उत्कृष्ठ अशी पध्दत पाहून पक्षाने त्यांना अनुसूचित जाती जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संधी दिली.
काम करण्याची पद्धत आणि त्यांची साधी राहणी आणि उच्च उच्च विचारसारणी पाहून अवघ्या 3 वर्षांत पक्षाने त्यांना रायरंगपूर मधून विधानसभेची उमेदवारी दिली व त्या भरघोस मतांनी निवडून येऊन आमदार झाल्या व नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल व भाजपा सरकारमध्ये २०००-२००४ साली राज्यमंत्री झाल्या.
त्याचबरोबर त्यानी मयूरभंज च्या भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणुनही उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली.
एकिकडे राजकीय क्षेत्रातील त्यांच्याकडील जबाबदारी वाढत होती परंतु कौटुंबिक जीवनात त्यांना खुप कठीण प्रसंगाना जाव लागल २००९ ते २०१५ या ६ वर्षाचा कार्यकाळ त्यांच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ होता.त्यांचे पती शाम चरण मुर्मू हे बॅकेत नोकरीला होते २ मुल आणि १ मुलगी असा त्यांचा ५ जनांचा सुखी परिवार होता परंतु या सुखी परिवाराला दृष्ठ लागली व २००९ साली त्यांनी आपला एक मुलगा गमावला त्यानंतर ३ वर्षांनीं दुसय्रा मुलाच अपघाती निधन झाल आणि २०१४ साली पतीचेही हृदयविकाराच्या धक्याने निधन झाल आणखीन दुर्देव म्हणजेच त्यांच्या आई आणि भावाचही निधन झाल अशा कठिण प्रसंगातून त्यांना जाव लागल.हे दु:ख सहन करण त्यांच्यासाठी खुप होत.
या ६ वर्षामध्ये त्यांनी आयुष्यातल्या प्रिय अशा ५ व्यक्ती गमावल्या या दुखातून बाहेर येण्यासाठी त्यांनी मेडिटेशनचा मार्ग अवलंबून स्वतला सामाजिक कार्यात झोकून दिल व ज्या घरी त्या रहायला होत्या जिथे त्यांच्या मुलांचा मृत्यू झाला तिथेच त्यांनी शाळा काढून समाजातील वंचितांसाठी व समाजासाठी शिक्षणाची सोय करून दिली.व समाजहिताची कामे करून त्यांना आपल दु:ख दूर केल.
त्यातच २०१४ साली भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच सरकार आल आणि २०१५ साली झारखंडच्या राज्यपाल म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली व २०१५ ते २०२१ मध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
त्यांची कार्यशैली साधी राहणी आणि उच्च विचारसारणी पाहून २०२२ साली पक्षाने त्यांची राष्ट्रपती पदासाठी निवड केली.
आणि त्या आज भरघोस मतांनी राष्ट्रपती म्हणून निवडून येऊन देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या.
त्यांच्या आयुष्यात आलेले अनेक कौटुंबिक कठिण प्रसंगावर मात करीत त्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहचल्या आहेत आयुष्यभर १० बाय १० च्या रूममध्ये राहणाय्रा आणि साधी राहणी आणि उच्च विचारसारणी जपणाय्रा श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच १३० हेक्टर (३२० एक्कर विस्तृत अस ) आणि ३४० खोल्या असलेल राष्ट्रपती भवन २५ जुलै रोजी स्वागतासाठी सज्ज आहे.
एक शिक्षिका,देशाची पहिली पहिली आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी विराजमान होतेय त्याचबरोबर त्यांचा आयुष्यभराचा संघर्ष व प्रवास प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे….RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युजच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐🙏