कवी लेखक यांची साहित्यसेवा ही देशसेवा समाजसेवाच असते.मा.प्राचार्य डॉ. एल.जी जाधव.
प्रतिनिधी:-संतोष बोंगाळे कराड:-9923900840

कवी लेखक यांची साहित्यसेवा ही देशसेवा, समाजसेवाच असते- मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव
कराड : (दि. १० जुलै) रविवार, दि १०/७/२०२२ दुपारी ४:०० वाजता गुगल मीट व युट्यूब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आषाढी एकादशीचे औचित्य साधून काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या तिसऱ्या आषाढी एकादशी ई विशेषांकाचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी समारंभास संबोधून ते म्हणाले की, “पंढरपूरची संत वारकऱ्यांची वारी ही सांस्कृतिक ठेवा आहे. श्री विट्ठललाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणारा प्रत्येकजन हा तेथून जगण्याची ऊर्जा घेऊन येतो. ही ऊर्जा त्यास वर्षभर पुरते. कवी लेखक यांची साहित्यसेवा ही देशसेवा, समाजसेवाच असते. संतांनी अभंगातून समाजप्रबोधन करून आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा जपला आहे. आजचे लेखन हे उद्याचा इतिहास ठरत असतो.”
“अखिल विश्वाचे दैवत- पांडुरंग” हे या आषाढी एकादशी ई विशेषांकाचे नाव असून प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ठाणेचे प्रसिद्ध साहित्यिक मा. विजय फडणीस हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष मा. आनंद घोडके, राज्य सचिव मा. कालिदास चवडेकर, सहसचिव मा. दीपक सपकाळ, राज्य सदस्य मा. सौ.जया नेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आषाढी एकादशी ई विशेषांकाचे प्रकाशनाचे हे तिसरे वर्ष असून यंदाच्या ई विशेषांकाचे संपादक कृष्णा शिंदे यांनी तर ई-बुक निर्मितीची जबाबदारी काव्यप्रेमी शिक्षक मंचचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रा. संतोष बोंगाळे यांनी पार पाडली. ८० हुन अधिक साहित्यिकांच्या लेखणीतून साकारलेल्या या आषाढी एकादशी विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रमोद बाविस्कर यांनी केले तर प्रास्ताविक कालिदास चवडेकर यांनी केले. तसेच प्रा. संतोष बोंगाळे यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.