ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुडाळ:-राजकीय गटांनी ओ बी सी उमेदवार अर्ज भरला तरी कुडाळ जि.प.गटात सामसूम…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) कुडाळ:-राजकीय गटांनी ओ बी सी उमेदवार अर्ज भरला तरी कुडाळ जि.प.गटात सामसूम…

कुडाळ दि: जावळी तालुक्यामध्ये निवडणुका म्हटलं की, स्वयंभू नेते गण व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो. परंतु, कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये भाजप विरोधात अपक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी निवडणूक होत आहे. इतर मागासवर्गीय महिला आरक्षण असल्यामुळे या निवडणुकीतील चुरस कमी झाली आहे.त्यामुळे सर्वत्र सामसूम वातावरण दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, दीपक साहेबराव पवार यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे आणि शिवसेनेचे ऋषिकांत शिंदे यांना मानणारा मोठा गट कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये आहे. या ठिकाणी मराठा , कुणबी मराठा,माळी समाजाचे मतदार खूप मोठी संख्येने आहेत. नशिबाने साथ दिली तर जिल्हा परिषद आरक्षणाचे अध्यक्षपद या भागाला मिळाले असते. परंतु, पहिल्या पायरीवरच आर्थिक निकषावर उमेदवारी डावल्याने इतर मागासवर्गीय समाजासोबतच जागृत व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरले आहे. याचा नेमका फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उचलला आहे . या ठिकाणी माळी समाजाच्या सक्षम महिलेला संधी देऊन समतोल राखला आहे. एकेकाळी दीपक पवार यांच्यासाठी प्रचारामध्ये सहभागी होणारे इतर मागासवर्गीय उमेदवारासाठी आता पवार कुटुंबीय प्रचारासाठी खेड्यापाड्यात उतरणार असल्याने या कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये थोडीफार रंगत वाढणार आहे. पण सध्या तरी दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराकडून सामसुमी दिसत आहे. खाजगी हॉटेल मध्ये चर्चासत्र सुरू झाले आहे . यामध्ये स्थानिक पातळीवर कार्यरत असणारे तळागाळातील सामान्य कार्यकर्ते कुठे ही दिसत नाही. हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.

कुडाळ सारख्या मोठ्या बाजारपेठ गावामध्ये जिल्हा परिषदेची हुकमी उमेदवारी न मिळाल्याने तोडजोडीचे राजकारण झाले का? असा प्रश्न कुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारणापेक्षाही प्रतिष्ठेला जागणारे मतदारांपर्यंत पेरला जात आहे. त्याचाही परिणाम या निवडणुक प्रचारात दिसून येणार आहे. तरी ही सर्वांनी मतदान करणे गरजेचे व लोकशाहीसाठी लाभदायक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माघारी घेण्याची तारीख जवळ आली तरी
धनदांडगे व जात दांडगे उमेदवारांचे प्रचार कुठेच दिसत नाही. मुठभर कार्यकर्त्यांची वाहनातील धावपळ सुरू आहे.प्रत्यक्षात मात्र मतदारांपर्यंत कोणी पोहोचले नाही. मेढा नजीक भोजनावळ झाली असली तरी मतदार उपाशी आहेत. असे नाही तर काहींनी संधी साधूंचे पाणी सुद्धा नको असा निर्धार केला आहे. त्याची मात्र जोरदार चर्चा कुडाळ गटात सुरू झालेली आहे.
सायगाव, बिभवी व आनेवाडी, कुडाळ, सर्जावर आणि सायगाव भागातील वाड्या वस्तीतील मतदान नेमके कुणाला जाईल? हे मात्र गुलदस्त्यात आहे. अजून प्रचाराची रंगत उडाली नसली तरी मतदारांना अपेक्षित उमेदवारी मिळाली नाही. हे मात्र सूर्यप्रकाश इतके स्वच्छ दिसत असल्याने नेत्यांची सुद्धा आता पळापळ थांबली आहे. तरीसुद्धा जागृत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करावा. वेळ पडल्यास उमेदवार पसंत नसेल तर नोटाला मतदान करावे असे नम्र विनंती कुडाळ जिल्हा परिषद गटातील राजकारणाचा गंध नसलेल्या पण सामाजिक भान असलेल्या युवा नेत्यांनी जाहीरपणे केली आहे. ती मात्र लक्षवेधी ठरली आहे.

2) कुसुंबी:-सागरा सारखे मन असलेल्या श्री धनावडे यांनी मन जिंकले…

कुसुंबी दि: राजकारणामध्ये आपल्याला मिळालेली संधी कोणी सोडत नाही. वेळ आली तर पक्ष निष्ठा आणि जात बदलून उमेदवारी घेणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. अशातच अनुकूल राजकीय परिस्थिती असतानाही युवा नेते श्री सागर धनावडे यांनी विजयाची माळ आपल्या गळ्यातील काढून दुसऱ्याला उमेदवारी सकट देण्याचा उपक्रम राबवला. सागरा सारखे मन असलेल्या श्री धनावडे यांनी मतदारांची ही मन जिंकले.
जावळी तालुक्यातील श्री काळुबाई देवस्थान मुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चेत आलेल्या कुसूंबी जिल्हा परिषद गटात जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे निकटवर्तीय व भाजप नेते तथा निवडणूक प्रभारी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक युवा नेते सागर धनावडे म्हणजे दृष्टीचे प्रतीक आहेत.दांडगा जनसंपर्क असूनही आता भाजपच्या उमेदवाराची मते मागण्यासाठी वाड्या वस्ती पिंजून काढत आहेत. आहे. आंबेघर गणात इतर मागासवर्गीय आरक्षण असताना व स्वतःकडे कुणबी मराठा प्रमाणपत्र असताना देखील श्री सागर धनावडे यांनी मूळ इतर मागासवर्गीय यांना संधी देण्याचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी आग्रह केला असता तर पक्षश्रेष्ठी नाही त्यांना उमेदवारी द्यावी लागली असती ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. तरीसुद्धा घेणाऱ्याचे घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं त्यांचे वागणे. राजकारणामध्ये आदर्श ठरले आहे.
जावली पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सभापती पदावर ते नक्कीच विराजमान झाले असते. जवळी दूध संघाचे माजी व्हाइस चेअरमन कैवारी विजय धनावडे यांनी काँग्रेस विचारधारा जतन केली होती. माजी आमदार कैवारी जी. जी. कदम, भिकू दाजी भिलारे गुरुजी, लालसिंगराव शिंदे यांच्या विचारांचा वारसा जपला होता. वैचारिक भूमिका तशीच ठेवून कै. विजय धनावडे यांनी सुद्धा अनेकांना संधी दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव श्री सागर धनवडे यांनी विचारांचा वारसा सुद्धा जपला आहे. इतर मागासवर्गीयांना न्याय देऊन ते खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचाराचे पाईक ठरले आहेत. भाजप पक्षासाठी त्यांचा सन्मान राखून त्यांना चांगले पद द्यावे अशी मागणी आता इतर मागासवर्गीय मागासवर्गीय तसेच सर्व जाती धर्मातील जावळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button