वाई:-सोयाबीन मध्ये यंदा बीज प्रक्रिया सरीवर टोकन,बीबीएफ पेरणी महत्त्वाची – श्री बेलदार
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
सोयाबीन मध्ये यंदा बीज प्रक्रिया सरीवर टोकन,बीबीएफ पेरणी महत्त्वाची – श्री बेलदार
वाई मंडळ कार्यक्षेत्रामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची पेरणी दरवर्षी केली जाते. परंतु यावर्षी बदललेल्या वातावरणीय स्थितीत सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये थोडे बदल करणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने भविष्यात सोयाबीन पिकामध्ये मातीमधून उद्भवणाऱ्या कीड व रोगांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करताना बीज प्रक्रिया करूनच लागवड करावी असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी श्री रविंद्र बेलदार यांनी केले आहे.
सोयाबीन बीज प्रक्रिया करताना रासायनिक व जैविक असे दोन टप्पे आहेत. रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये इमेडोक्लोपीड हे कीटकनाशक 1.25 मिली प्रति किलो या प्रमाणामध्ये वापरण्यात यावे. तसेच जैविक बीज प्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक पाच मिली प्रति किलो या प्रमाणात व रायझोबियम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पी एस बी) हे पाच मिली प्रति किलो जर रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू हे पावडर स्वरूपात असतील तर दहा किलो बियाण्यास अडीचशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची सोयाबीन बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे भविष्यातील मातीतून उद्भवणारे तसेच अनेक विषाणूजन्य कीड व रोगापासून सोयाबीन पिकाचे संरक्षण होऊ शकेल.
त्याचप्रमाणे यावर्षी हवामान विभागाचा अति जास्त पावसाचा अंदाज पाहता सोयाबीन लागवड सरीवर टोकन पद्धतीने किंवा बीबीएफ यंत्राच्या सहाय्यानेच करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अतिवृष्टी झाल्यास त्यापासून पिकाचे संरक्षण होऊ शकेल.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत ग्राम स्तरावर खरीप हंगाम मोहीम सुरू आहेत त्यामध्ये बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक उगवण क्षमता प्रात्यक्षिक बीबीए पेरणी महत्त्व या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन चालू आहे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची ही माहिती यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन श्री बेलदार यांनी केले आहे.