सातारा:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी आमदार व मंत्री झालो मा.ना.संजय सावकारे
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी आमदार व मंत्री झालो मा.ना.संजय सावकारे
अनु. जाती/जमाती / विजाभज/इ.मा.व./वि.मा.प्र. शासकीय / निमशासकीय अधिकारी कर्मचारी / अधिकारी संघटना व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या विद्यमाने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दि. २७ मे, २०२५ रोजी दुपारी ०४.३० वाजता मंत्रालयातील परिषद सभागृह, सहावा मजला, येथे संपन्न झाला. छ.शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व इतिहास अभ्यासक मा.डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तदनंतर मा.ना.श्री.संजय सावकारे, मंत्री (वस्त्रोद्योग), महाराष्ट्र राज्य. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा.डॉ.हर्षदिप कांबळे, दैनिक सम्राटच्या संपादिका निलिमा बबन कांबळे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये राहत असलेले घर मी राज्यमंत्री असताना भेट देण्यासाठी इंग्लंडमध्ये गेलो होतो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करताना क्षणात माझ्या सर्व भावना प्रगट झाल्या आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी आमदार व मंत्री झालो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आमच्या जीवनाचे सोने झाले. आता आपली जबाबदारी आहे की त्यांचे विचार आपण पुढील पिढीपर्यंत पोहचवूया असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजय सावकारे यांनी केले. पुढें ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी कुठल्या एका जाती धर्मासाठी काम न करता सर्व मानवी कल्याणचे, उन्नतीचं आणि प्रगतीचे कार्य केले. महापुरुषांना जात धर्म नसतो म्हणून ते महापुरुष असतात महापुरुषांनी कधीही भेदभाव केला नाही. आज आपला महाराष्ट्र या महापुरुषांच्या विचारधारेमुळे संपन्न झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे व त्यांचे सहकारी हे नेहमी पदोन्नती आरक्षण हा विषय घेऊन माझ्याकडे येतात. मी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन स्वतः देवेंद्र फडणीस यांच्याकडे आपण सर्व जाऊ आणि हा विषय निकालात काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
या संघटनेच्यावतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम प्रत्येक वर्षी मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात येतो पण यावर्षी अनेक अडचणी, अवकाळी पाऊस या सर्वांवर मात करून संघटनेने जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार व व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे, दैनिक सम्राटाच्या संपादिका नीलिमा बबन कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या शिवराय ते भीमराय या विषयावरील व्याख्यानात सर्व महापुरुष सामाजिक लढ्याचे अग्रदूत होते. त्यांनी आपापल्या काळात जाती धर्म, पंथ, प्रांत,लिंग यापलीकडे जाऊन मानवाच्या प्रगतीचे, सामाजिक उन्नती व समतेचे कार्य केले. विषमतावादी व्यवस्थेविरोधात लढून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विचार मांडताना महापुरुषांची विचारधारा आता आपल्या पिढीने पुढील पिढीपर्यंत पोहचवणे ही नैतिक जबाबदारी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रगती,आर्थिक उन्नती, विकास विज्ञान वादाचा असून हा विचार पुढील पिढीला सांगण्यासाठी तरुण पिढीला जागृत करण्यासाठी विभागावर कार्यक्रम होणे गरजेचे आहे. होता आलेली आहे आपल्या सर्वांचं काम आहे हे काम करताना चळवळीसाठी दान पारमिता बाळगली पाहिजे कारण दान दिल्याने दान कमी होत नाही तर ते वाढतच जाते. आपण दान दिले पाहिजे आणि दान दिल्याने काही कमी होत तर दान वाढत असते .यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी अत्यंत आक्रमक मनोगत व्यक्त करताना शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे पदोन्नती आरक्षणासह संघटनेच्या अनेक मागण्या असून आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्री यांच्यासह अनेक सबंधित मंत्री यांना निवेदने दिली बैठका घेतल्या पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. यापुढे आम्ही सरकारकडे मागण्या मागणार आहोतच पण आम्हाला न्याय दिला नाही तर आमची लढाई संविधानात्मक रित्या रस्त्यावर लढल्या जाईल. मी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनंती करतो की आता आपण आरपारच्या लढाईला तयार रहा असे आपल्या भाषणात सांगितले. यानंतर अनु. जाती/जमाती/वि.जा/ भ. /ज/इ मा व/ वि.मा. प्र. शासकीय/ निमशासकीय अधिकारी/ कर्मचारी संघटना (रजी) मंत्रालय यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते अनेक उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे मुख्य मार्गदर्शक मा.श्री. लक्ष्मीकांत ढोके, सहसचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, श्री.अंबादास चंदनशिवे, उप सचिव, कृषि विभाग व स्वागताध्यक्ष जयंती उत्सव समिती, डॉ. सुदिन गायकवाड, सह सचिव, जलसंपदा विभाग, श्री.अशोक आत्राम, सह सचिव, श्री.दिनेश डिंगळे, सह सचिव, श्री भास्कर बनसोडे, अवर सचिव, श्री. सुबोध भारत, स्वीय सहाय्यक, मंत्री, पर्यटन, श्री. विजय नांदेकर, कक्ष अधिकारी, श्री.बा.ई. सावंत, अवर सचिव, श्री.सी.आर. निखारे, कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग, श्री सुभाष गवई, अध्यक्ष जयंती उत्सव समिती, राज्य महासचिव डॉ.उत्तमराव सोनकांबळे, श्रीमती सविता शिंदे, स्वीय सहाय्यक, सिडको- महिला आघाडी प्रमुख, श्री.राजेंद्र सवने, उप सचिव, श्री.बनकर, सह सचिव, श्री.वैभव काळखैर, मंत्रालय संघटक श्री.राज श्रॉफ, दिपाली सहारे, राजेंद्र धावारे, स्तंभलेखक दादाभाऊ अभंग, सुप्रसिध्द गायक विष्णु शिंदे, श्रीमती निलिमा मेश्राम, श्री.बाबुसिंग राठोड, श्री.सोनु वाडकर, श्री.गजानन सारुक्ते, पंकज सावदेकर, डॉ.कृष्णामुर्ती, प्रा.भार्गव बोलके, इजि.अभय यादव, इंजि.करण पांचाळ, मिथील रणपिसे, ॲङ पंचशिला बडेकर, आदित्य वानखेडे, चे.रा.साळवी, श्री.तांदळे (प्रसिध्दी), करण माळवे, पत्रकार, सकाळ, सुरेंद्र सोनकांबळे, स्वीय सहाय्यक स्नेहा कुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मंत्रालयामध्ये महापुरुषांच्या जयंतीसारखा प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंत्रालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी /कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केलेत. कार्यक्रमाचे यथोचित सूत्रसंचालन श्री.संतोष साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण व प्रसारण श्री.प्रदिप ननावरे व आकाश आठवले, अमित गायकवाड व मनोहर अहिरे यांनी केले.