सातारा:-बालिका पंचायत व Dignity Center मधील मुली व मुलांचे नेतृत्व-विकास प्रशिक्षण.
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
बालिका पंचायत व Dignity Center मधील मुली व मुलांचे नेतृत्व-विकास प्रशिक्षण.
दिनांक – १८/११/२०२३
सातारा येथे किशोरवयीन मुली व लहान मुलांचे नेतृत्व विकास प्रशिक्षण निर्माण बहुऊदेशीय विकास संस्थेमार्फत आयोजित केले आहे. निर्माण संस्था नेहमीच मुलांच्या भविष्याचा व त्यांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करत असते. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने *सातारा तालुका पोलिस* स्टेशनचे *पोलीस उपनिरीक्षक श्री.फाळके सर*, *ASI श्री.मोरे सर*, *श्री.वाघमारे सर*, *सौ.मोहिते मॅडम (भरोसा सेल)*, *सौ.पवार मॅडम*, *सौ.फाळके मॅडम* ई. पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत बालिका पंचायत मधील मुली व Dignity Center मधील मुलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
मुलांना मार्गदर्शन करताना वाघमारे सरांनी प्रथम निर्माण संस्थेचे आभार मानले की मुलांना थोडे का होईना ज्ञान देण्याची संधी मिळाली. ते बोलताना म्हणाले की, पाया भक्कम करण्यासाठी निर्माण संस्था तुम्हाला हातभर लावतेय ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे त्यामुळं आत्ताच पाया भक्क्कम करा. तसेच मुलांना काही अडचणी असल्यास त्यासाठी पोलीस् खात्यात बालकांसाठी समुपदेशक खाते असते. समुपदेशक तुम्हाला मार्ग दाखवतील. तुम्ही खूप शिका मोठे व्हा व निर्माण संस्थेचे नाव रोशन करा हे त्यांचे शब्द मुलांसाठी तसेच निर्माण संस्थेसाठी कौतुकाचे होते. त्यांनी मुलांसाठी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे, स्टुडन्ट पोलीस कॅडेट या उपक्रमामध्ये शाळेत जावुन् मार्गदर्शन केले जाते. पोलीस खाते काय काम करते, FIR, यासारखे शिक्षण दिले जाते. फाळके सर म्हणाले शिक्षणासाठी निर्माण तुम्हाला मदत करते त्यामुळं शिका आणि अशा संस्थेचे नाव मोठे करा. मोहिते मॅडम नी सांगितले बालपथक हे खाते आहे तिथ तुम्ही काही अडचणी असल्यास तक्रार सांगा ती गोपनीय राहते अशी माहिती मुलींना सांगितली.
आजच्या प्रशिक्षणनाचे प्रशिक्षक श्री.दिगंबर सर (Dignity Academia, Pune) यांचे स्वागत पुष्पगुछ देऊन केले व त्यांनी त्यांच्या आजच्या प्रशिक्षणास सुरुवात केली. सर्वात प्रथम त्यांनी हीच आमुची प्रार्थना या प्रार्थनेने सुरुवात केली. त्यानंतर वेगळ्या वस्तीतून आलेल्या मुलांनी एकत्र व्हावे यासाठी एका एका बोटीत किती किती लोक हा खेळ घेण्यात आला. त्यानंतर देश म्हणजे काय राष्ट्र म्हणजे काय यातला फरक सांगून देश व राष्ट्र एकच आहे हे सांगितले. संयुंक राष्ट्र ही संकल्पना स्पष्ट केली. 193 देशांनी एकत्र येऊन संयुंक राष्ट्र संघ तयार केला. युद्धमुळे लहान मुलांचे आयुष्य खराब होते त्याचे भविष्य उज्ज्वल होण्याआधी ते संपते. बालकांना त्यांचे हक्क मिळावे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी सर्व देशांनी बालहक्क संहिता 1959 साली सुरु केली व त्यावर भारताने स्वाक्षरी केली. म्हणून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बाल हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. जगण्याचा हक्क , विकासाचा हक्क, सहभागाचा हक्क,सुरक्षितातेचा हक्क हे हक्क त्यांना सांगण्यात आले.
मुलांनी स्वतः Mobilization कसे करावे यासाठी एक activity घेण्यात आली. त्यामध्ये चार गट तयार केले, त्या गटामध्ये एक एक अध्यक्ष निवडून दिला व सर्व जबाबदारी त्यांना दिली.मुलांना कविता, गाणी, खेळ, नाटक, नृत्य असे विषय त्यांना वाटून दिले व ते सादर करण्यास सांगितले. त्यांनंतर त्या गटांना बालविवाह, बालकामगार हे विषय देऊन त्याचे परिणाम व कारणे मोठ्या कागदावर लिहण्यास सांगितले. कारणे अशी होती की, आर्थिक परिस्थिती, जबाबदारी, वाढते गुन्हे, ई. तर परिणाम असे होते शिक्षण संपते , सर्व जबाबदारी लहान वयात घ्यावी लागते, शरीरिक व मानसिक आजार होतात ,नंतर या सर्व कारणे व परिणाम् हे चढत्या क्रमाने ठेवले व त्याला Problem Tree असे नाव दिले. हे सर्व संपावे, सर्वांना शिक्षण त्यांचे हक्क मिळावे या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे व ही तुमची जबाबदारी आहे असे मुलांना सांगण्यता आले.
मुलांना थोडे फ्रेश वाटावे यासाठी मुलांनी त्यांच्या आवडीची गाणी म्हणून दाखवली. काही मुलींनी नृत्य सादर केले. यांनंतर शेवटी मुलींना व मुलांना आजचे प्रशिक्षण कसे वाटले हे विचारले असता मुली म्हणाल्या स्त्रियांना काय अडचणी येतात याबद्दल माहिती झाली, मुलांचे अधिकार प्रमुख चार आहेत ते समजले, सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी खेळ घेणे आवश्यक आहे हे समजले, असे प्रशिक्षण वारंवार व्हावे म्हणजे खूप माहिती मिळत जाईल अशा सुंदर प्रतिक्रिया मुलांनी दिल्या. या प्रशिक्षणामध्ये निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेचे, निर्भया प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक विक्रांत मोरे तसेच सायली पडवळ, चांदणी चंदनशिवे, सुचिता सातपुते, विद्या गडकरी, रमेश पुजारी व नम्रता खरात हे उपस्थित होते.