वाई:-“महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेता म्हणजे स्व.प्रतापराव भोसले (भाऊ)..” – प्रा. दत्तात्रय वाघचवरे.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.20
“महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेता म्हणजे स्व.प्रतापराव भोसले (भाऊ)..” – प्रा. दत्तात्रय वाघचवरे.
“१९७० ते २०१० या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणात स्व.प्रतापराव भोसले (भाऊ) यांचा दरारा खूप मोठा होता. राजकीय पटलावर त्यांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा होता. तसेच त्यांचा जनसंपर्कही तेवढाच मोठा होता. त्यामुळे समाजातील गरीब,वंचित, उपेक्षित लोकांविषयी स्व.प्रतापराव भोसले (भाऊ) यांना प्रचंड कणव होती. भाऊंचे व्यक्तिमत्त्व सुंदर आणि सुसंस्कृत होते. त्यामुळेच किसन वीर महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण अत्यंत उत्साही आणि सौहार्दपूर्ण होते. ते आजही मला जाणवत आहे”. असे प्रतिपादन माजी इतिहास प्रमुख प्रा. दत्तात्रय वाघचवरे यांनी केले. येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या पाचव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, उपप्राचार्य श्री. भिमराव पटकुरे, प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.अंबादास सकट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे,पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव तसेच राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. रमेश डुबल, सुटा संघटनेचे प्रा.ए.पी. देसाई, श्री. गणेश चव्हाण, डॉ. रवींद्र बकरे, श्री. पी.जे.जाधव उपस्थित होते.
प्रा. वाघचवरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,” सुसंस्कृतपणा हा शिक्षणावर अवलंबून असतो असं नाही तर ते संस्कारावर अवलंबून आहे. हे भाऊंनी आपल्या व्यक्तिमत्त्वातून सिद्ध केले. १९५० ते १९७५ या दरम्यान असणारे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी या देशात एक सुसंस्कृत विचार आणला. त्यामध्ये स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. किसन वीर आबा, स्व. वसंतदादा पाटील, स्व. प्रतापराव भोसले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये मा.भाऊंचा वाटा सिंहाचा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.”
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “स्व.भाऊंनी ज्या तत्त्वनिष्ठ विचारांची कास धरून वाटचाल केली त्याच तत्त्वनिष्ठ विचारांचा वारस होण्याचा प्रयत्न आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून करत आहोत. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. हे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून त्यांच्या मासिक पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजन केलेले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.अंबादास सकट यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.