वाई:-किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन संपन्न.
वाई दि .30
विद्यार्थ्यांनी शरीराच्या व मनाच्या आरोग्याची जोपासना करावी. – मा. सुनील शिखरे
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन संपन्न.
विद्यार्थ्यांनी शरीराच्या व मनाच्या आरोग्याची जोपासना करावी. सुदृढ शरीर आणि मन असणारा युवकच देशाचे व समाजाचे सेवा करू शकतो. त्यासाठी मोबाईलचा तारतम्याने वापर करायला पाहिजे, असे उद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक मा. सुनील शिखरे यांनी काढले.
येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य (प्रा.) डॉ. ज्ञानदेव झांबरे होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री हरेश कारंडे सहसमन्वयक डॉ. विलास खंडाईत हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मा. शिखरे पुढे म्हणाले की, आपल्या देशाला समाजसेवेची आणि देशसेवेची फार मोठी परंपरा लाभली आहे. निस्पृहपणे तीन पिढ्यांपर्यंत समाजसेवा करणाऱ्या बाबा आमटे यांच्या परिवाराचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. प्रामाणिकपणे आचरण करणारा तरुण हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. मोबाईल सारख्या माध्यमांचा उपयोग ज्ञान संवर्धनासाठी केला तर केवळ परीक्षार्थी म्हणून शिक्षणाकडे न पाहता विद्यार्थी म्हणून स्वतःच्या जीवनाला सामोरे जाण्याची क्षमता आजच्या तरुणाई मध्ये येईल. आपल्याला लाभलेल्या दुर्लभ मानवी जीवनाचे सार्थक होईल असे भान तरुण पिढीने सतत ठेवायला हवे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी समाजातील आदर्श स्वयंसेवक असतात. जीवनाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी त्यांना या विभागामार्फत प्राप्त होते. समाजसेवेतून लागणारा आत्मानंद हा अमोल असतो, म्हणून आजच्या तरुण पिढीने देशसेवेचे व्रत अंगीकारले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये अनुभवलेले क्षण तरुणांना आयुष्यभर प्रेरणादायी ठरतात. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळासाहेब कोकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त आबासाहेब वीर व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. डॉ. विलास खंडाईत यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक श्री. हरेश कारंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ एस. एम. माने यांनी आभार मानले. श्री. शिवाजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. श्री. सुशांत स्वामी, श्री. शशांक ढोणे, श्री. राजन करपे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.