गंगापूर:-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन रोडला भेगा.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन रोडला भेगा.
रायपूर तालुका गंगापूर या गावापासून माळीवाडगाव पर्यंत झालेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा जवळजवळ आठ कोटी रुपये खर्च करून बनविलेला रोड अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये नादुरुस्त झाला असून या रोडवर जवळजवळ सहा-सहा व आठ-आठ इंच रुंद भेगा पडल्या आहेत. सदरील भेगा बुजवण्याचं काम कॉन्ट्रॅक्टर थातूरमातूर करत आहेत परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नसून पुन्हा महिना पंधरा दिवसांमध्ये याच भेगा आणखी जास्त धोकादायक झालेल्या दिसून येतील… या भेगा बुजविण्याचा प्रयत्न यापूर्वी देखील कऱण्यात आला आहे परंतू फाउंडेशन कमकुवत असल्यामुळें हा प्रकार घडत आहे असे स्थानिक नागरीक सांगत आहेत. या भेगा कितीही वेळा बुजविल्या तरी त्या पुन्हा पुन्हा रुंद होत जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी या भेगा आहेत तो रोडच पुन्हा करावा लागणार आहे त्याशिवाय वेगळा कुठलाही पर्याय उरलेला नाही. या रोडचे राहिलेले एक किलोमटरचे अधुरे काम देखील आणखी पूर्ण झालेले नाही. सदरील काम पूर्ण व्हावे यासाठी रायपुरवासी यांनी या अगोदर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलेले आहे. त्यावेळी 20 दिवसांचा वेळ सार्वजनिक बांधकाम विभागाने मागितला होता.. त्यास आता बरेच महिने उलटून गेले आहेत. तसेच एक दोन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अर्धा पाऊण एकर पाणी तुंबून राहत असून ते पाणी रोडच्या नाल्यांमधून पास होऊन किंवा बनविलेल्या पुलाच्या माध्यमातून पास होऊन काढून द्यायला हवे होते परंतु तसे न करता साईडला बनवलेल्या नाल्या शेतकऱ्यांनी बुजविल्यामुळे काही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे… तरी ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबून राहत आहे त्या ठिकाणी रोड लगत झालेल्या साईडच्या नाल्या पूर्ववत करून द्याव्यात जेणेकरून त्या नाल्यांच्या मार्फत ते तुंबलेले पाणी नैसर्गिक प्रवाहाच्या माध्यमातून वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. यावेळी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टर तथा संबंधित इंजिनियर यांच्यासोबत फोन द्वारे चर्चा केली परंतु सदरील कॉन्ट्रॅक्टर तथा इंजिनिअर कडून नागरिकांना कुठलाही दिलासा मिळत नाही … ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी तुंबून आहे त्या शेतकऱ्याने उपोषणासाठी देखील अर्ज केलेला होता परंतु त्या अर्जास देखील केराची टोपली सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेली आहे… सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला दिसून येत नाही… किंवा त्यांच्या अखत्यारीत असलेल्या रोडवर झालेले अतिक्रमण देखील सदरील विभाग हटवू शकत नाही ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहे. यामध्ये जे नागरिक दोषी आढळतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करून प्रलंबित राहिलेले काम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित करावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे…….