कोयना नगर:-कोयना धरणग्रस्तांची आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर – चैतन्य दळवी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
कोयना धरणग्रस्तांची
आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर – चैतन्य दळवी.
कोयना नगर दि:
आज मंगळवार दि .२७ रोजी दुपारी कोयना नगर तीन मंदिर येथे कोयना धरण ग्रस्तांचा मेळावा पार पडला. मेळावा मध्ये धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा व आता पर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करण्यातील असे प्रतिपादन धरणग्रस्तांचे युवा नेते चैतन्य दळवी यांनी केले.
सातारा- सांगली जिल्हा मध्ये कोयना धरणग्रस्तांनी जमीन मागणी अर्ज केलेल्या पात्र खातेदारांना लवकरात लवकर जमीन वाटप होणे, गोकुळ, रासाटी, हेळवाक, शिवंदेश्वर या गावांना खास बाब म्हणून पुनर्वसनचे लाभ देणे, ज्या पुनर्वसित गावांना नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांना नागरी सुविधा देण्यात याव्या, शौचालय, घर बांधणी अनुदान लवकरात देण्यात यावे, प्रकल्प ग्रस्त दाखले देणे बंद केले आहे ते चालू करणे, अश्या व इतर प्रलंबित गोष्टी लवकरात लवकर चालू कराव्यात अन्यथा येत्या काही दिवसात सातारा आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यलय येथे आंदोलन पुकारले जाईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले.
कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गेली सहा वर्ष कोयना धरणग्रस्त वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन उपोषण मोर्चे काढत आहेत. आपला न्याय हक्क शासनाकडे मागत आहेत, मागील वर्षी आंदोलन केल्यानंतर सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये जमीन पसंतीचा कार्यक्रम राबवला गेला आणि त्यातून जवळजवळ ११०० ते १२०० धरणग्रस्त अर्जदारांनी जमीन मागणीसाठी अर्ज केले आहेत .मुळात मुळात ४५ दिवसांमध्ये जमीन मागणी अर्जावर कार्यवाही होणे गरजेचे आहे . असे असताना गेली ११ महिने त्यावर कोणतीही हालचाल झालेली नव्हती. फेब्रुवारी महिन्यामध्ये माननीय पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनुसार सातारा आणि सांगली जिल्ह्यामधील पात्र खातेदारांचे प्रस्ताव जमीन वाटप व्हावी. यासाठी आयुक्त कार्यालय मार्फत मंत्रालय स्तरावर पाठवून द्यावेत. अशा स्पष्ट सूचना असताना देखील सातारा जिल्ह्यातील एकूण अर्जांपैकी केवळ १४४ पात्र धरणग्रस्त खातेदारांचे अर्ज आयुक्त कार्यालयामध्ये पाठवले गेले आहेत. परंतु, सांगली जिल्ह्यामध्ये केलेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही पुनर्वसन विभाग सांगली जिल्ह्याने केलेली नाही. सांगली जिल्ह्यातील जमीन पसंतीचे अर्ज धुळखात पडलेले आहेत. या बाबींवरही विचार विनिमय करण्यात आला.
मेळाव्याला धरणग्रस्त चळवळीचे युवा नेते चैतन्य दळवी, सचिन कदम, सीताराम पवार, महेश शेलार, शिवाजी कांबळे, विनायक शेलार, राम कदम, डी के साळुंखे, राजाराम जाधव, दादू थोरवडे, साधू सपकाळ, किसन सुतार, श्रीपती माने,निवृत्ती सपकाळ,लक्ष्मण पवार , सुलेमान शिकारी,गजराबाई खराडे, कृष्णाबाई थोरवडे, आणि धरणग्रस्त उपस्थित होते.
राज्यभर शासन आपल्या दारी योजना राबवली जात आहे. परंतु, हे सामान्य जनतेचे सरकार आहे असे म्हणणारे मुख्यमंत्री हे स्वतः कोयना धरणग्रस्त असून देखील कोयना पुनर्वसनाचे प्रश्न जैसे थे आहेत.त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वी झालाय का? आणि कोयना धरणग्रस्तांच्या दारी शासन कधी येणार? असा प्रश्न धरणग्रस्त लोकांपुढे पडला आहे. असे काही धरण नसताना आपले मत व्यक्त केले.
——————————————–
फोटो कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मत व्यक्त करताना युवा नेते चैतन्य दळवी (छाया – निनाद जगताप, कोयनानगर)