श्रीरामपूर:-मराठ्यांची मुले मोठी होऊ नये म्हणून हे षडयंत्र – जरांगे
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
श्रीरामपूर
मराठ्यांची मुले मोठी होऊ नये म्हणून हे षडयंत्र – जरांगे
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) मराठ्यांना आरक्षण न देण्याचाच पंतप्रधान मोदी . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कट होता, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचं हत्यार उचललं आहे. महिन्याभरापूर्वी ही त्यांनी असंच आंदोलन केलं होतं तेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने महिन्याभराची मुदत मागितली होती . मात्र . २४ ऑक्टोबरला ही मुदत संपल्यानंतरही आरक्षणाचा निर्णय झाला नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे . या पार्श्वभूमी वीर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौर्यावर असताना भाषणात त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा उलेखही केला नाही . असं म्हणत आता मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान . मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वर कारस्थान केल्याचा आरोप केला आहे जरांगे पाटील म्हणाले . आता गोरगरीबांची गरज पंतप्रधान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना गोरगरीबांची गरज राहिली नाही असा संदेश महाराष्ट्र व देशभरात गेला आहेत . त्यांनी आमच्याकडुन 30 दिवसांचा वेळ घेतला होता . पण आरक्षण दिलं नाही याचा अर्थ सरकारसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये हे षडयंत्र रचलं होतं असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तुम्ही मराण्यांचा ओबीसीत समावेश का करत नाही मराठा समाजाचं आयुष्य उद्धस्त व्हायला पाहिजे यासाठीच तुम्ही आरक्षण देत नाही आहात . सगळ्या गोष्टी तुमच्या अंगलट आल्या आहेत . पुरावे मिळूनही आरक्षण देत नाही . त्यामुळे तेही तुमच्या अंगलट आलंय . तुम्हाला नाक नसल्यासारखं झालंय . तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलं आहे ‘ असंही जरांगे पाटील म्हणाले .