साताऱ्यात पावसाने दैना, प्रचारकांच्या भेटी लागे जीवा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात पावसाने दैना, प्रचारकांच्या भेटी लागे जीवा…
सातारा दि: सातारा शहरासह जावळी ,सातारा व वाई ,पाटण, माण ,महाबळेश्वर खंडाळा, कराड, कोरेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने दैना उडाली. अनेक ठिकाणी घराची पडझड व शाळेचे पत्रे उडून गेले आहेत. रचलेल्या कडब्याच्या गंजीचे नुकसान झाले आहे. मतदार म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते व दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रचारकांच्या भेटी लागे जीवा लावलीस आस… अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे. अजून पर्यंत कुणीही फिरकले नसल्याने बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात याचा अनुभव आता सातारकर घेत आहेत.
सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष उमेदवाराच्या प्रचार निमित्त अनेक वचननामे, अभिवचन दिले होते. अजून निवडणूक निकालाला अवधी असतानाच कोणीही आता अवकाळी पावसाने दूरदर्शन झालेल्या भागात फिरकेना.. अशी परिस्थिती झाली आहे. पुढे पाच वर्षे काय होणार? याची आता संकटात सापडलेल्या मतदारांना चिंता वाटू लागलेली आहे.
गेली महिनाभर सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी राजकीय पक्षासोबत महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी व काही अपक्ष उमेदवारांनी व त्यांच्या प्रचारकांनी पायात भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबवली होती. आम्हाला मत द्या आम्ही विकास करतो. आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवतो. अशी बतावणी करून मते पदरात पाडली. आता अवकाळी पावसाने तमाशा केला तरी नेत्यांना या परिस्थितीची पाहणी करण्यास वेळ मिळत नाही. खरोखरच लोकशाही आहे का? असं म्हणण्याची पाळी संविधान प्रेमींवर आली आहे.
मागील दोन महिन्यांपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली होती . कधी नव्हे एवढे ४३ डिग्री तापमानापर्यंत उन्हाचे चटके सहन करत गोरगरीब व कष्टकरी ,शेतमजूर जीवनाशी संघर्ष करत आहेत. त्यांना या अवकाळी पावसाने अधिकच संकटात टाकले आहे.
अनेक ठिकाणच्या पत्र्याच्या शेड व शाळेच्या खोल्याचे पत्रे उडाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानांची नुकसान झाले आहे. शाहूपुरी येथील चिंतामणी सोसायटीच्या मोकळ्या जागेतील वडाच्या झाड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे अजित किराणा स्टोअर च्या दुकानात पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती खेड्यापाड्यातील छोट्या- मोठ्या व्यवसायिकांची झाले आहे. याबाबत पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब चव्हाण, घर संघटनेचे नेते किशोर धुमाळ यांनी केली आहे.
शिरवळ या ठिकाणी यात्रेच्या दिवशीच वादळी वारंवार व विजेच्या कडकडाट असं पाऊस कोसळल्याने बाजार व यात्रेसाठी आलेल्या लोकांची दैना उडाली. अनेक ठिकाणी चिखल झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणीही पावसाने हजेरी लावल्यामुळे पर्यटक व स्थानिकांना त्या पावसाळ्यात भिजल्यामुळे त्यांना गारठ्याचाही अनुभव घ्यावा लागला. वीज कोसळल्याने फलटण येथील बॅटरीवर चालणाऱ्या मोटरसायकलचे नुकसान झाले तर एकाला आपला जीव गमावा लागला. दोघे जखमी आहेत .
कराड तालुक्यातील घोगाव येथील प्राथमिक शाळेच्या तीन खोल्याचे पत्रे अँगल्स उडून गेल्यामुळे शैक्षणिक साहित्याचे नुकसान झालेले आहे .ढेबेवाडी भागामध्ये मल्हारपेठ हेळवाक चिखली, चिमणगाव, गलमेवाडी काढणे, मानेगाव आदी गावात शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले. घराचे पत्रे उडालेले आहेत. थोडीशी उघडीत मिळाल्यानंतर लोकांना आता पुन्हा उभारणीसाठी साहित्य गोळा करण्यात सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी झाड उन्हाळी पडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेले आहे.
माण तालुक्यातील दहिवडी भागातही पावसामुळे वीज गायब झाली असून कांद्याचे कडब्याच्या प्रचंड नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. आता हा चारा वाळवण्यासाठी पुन्हा पसरून ठेवण्यात येत आहे.
पाटणमध्येही गाराचा पाऊस पडून प्रत्येक रस्त्यावर पाणी साचले आहे. मो रणी विभागातील वीजपुरवठा खंडित झाला असून कोरेगाव व जावळी तालुक्यातही पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. शासकीय पातळीवर सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज पाहण्यास प्राधान्य देत असल्यामुळे सध्या पंचनामा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी. अशी मागणी पुढे आलेली आहे. सातारा तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असली तरी वाड्या वस्तीमध्ये राहणाऱ्या व उघड्यावर संसार थाटणाऱ्यांचा संसार उध्वस्त झालेला आहे. त्यांच्याकडे मानवता भावनेतून पाहून स्थानिक पातळीवर त्यांना मदत करावी. यासाठी सामाजिक संस्थेने पुढाकार घ्यावा त्यासाठी कुठलीही आचारसंहिता नाही हे लक्षात ठेवावे. या पावसामुळे तलाव व धरण परिसरात काही प्रमाणात पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असली तरी अजून मोठ्या पावसाचे अपेक्षा आहे. शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असल्यामुळे या पावसाने कभी खुशी तो कभी गम असे वातावरण केले आहे.