
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके
मायणी, चोराडे, ई.परिसरात पहाटे जोरदार पाऊस.
मायणी प्रतिनिधी—–मायणी, कलेढोण, विखळे, बेलवाडी, गारळेवाडी, पाचवड, मुळीकवाडी, चितळी, मराठा नगर, या परिसरात पहाटे पाच वाजल्यापासून ढगांच्या गडगटासह विजेच्या कडकटासह झालेल्या जोरदार पावसाने मायणी परिसराला अक्षरशः झोडपून काढले त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले आहे त्यानंतर आज सोमवारी दुपारी दोन वाजता पुन्हा पाऊस झाल्याने व दिवसभर पावसाची रिप रिप सुरू असल्याने खरोखरच पावसाळा सुरू झाला की काय असे वाटू लागले आहे या मुसळधार पावसाने बळीराजा आनंदला असून खरिपाच्या पिकाची लगबग आता सुरू होणार आहे यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे झालेल्या पावसाने जागोजागी पाणी साचले असून काही शेतकऱ्यांचा ऊस फोडणीचा कार्यक्रम सुरू होणार होता परंतु अचानक झालेल्या पावसामुळे तू आता लांबणीवर पडलेला आहे तसेच द्राक्ष बागायतदारांच्या द्राक्षाच्या बागेला लागलेल्या काड्यांना नुकसान पोहोचले आहे लवकरच खरीपाचा हंगाम सुरू होणार असून अनेक शेतकऱ्यांनी आपली नांगरट पूर्ण केली आहे तसेच या पावसाने नांगरटीच्या सरी पाण्याने पूर्ण भरून गेले आहेत यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असे बळीराजाला वाटू लागली आहे खरीप हंगामात मूग, चवाळी, घेवडा, उडीद, हायब्रीड, मका, या कडधान्याची पेरणी केली जाते या कडधान्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते गतवर्षी अति पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता निदान यंदाचा तरी हंगाम पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे दिवसभर पाऊस सुरू असल्याने हवेत गाळता निर्माण झाला होता उन्हाळ्याने त्रासलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे या पावसामुळे विहिरीतील पाण्याची पातळी नक्की वाढेल असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.