सातारा:-ज्योतिष, अध्यात्म हेच मानवाला संजीवनी देऊ शकतात _____प्रा,डॉ.विकास खिलारे.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्योतिष, अध्यात्म हेच मानवाला संजीवनी देऊ शकतात _____प्रा,डॉ.विकास खिलारे.
मायणी प्रतिनिधी___(फोटो पदवीदान समारंभात बोलताना डॉक्टर विकास खिलारे व मान्यवर) ज्योतिष क्रियाशील अध्यात्म असून ज्या ठिकाणी वैद्यकीय किंवा तांत्रिक प्रवास संपतो त्या ठिकाणी अध्यात्म व ज्योतिषशास्त्राचा प्रवास सुरू होतो याशिवाय ज्योतिष शास्त्र हे एकमेव शास्त्र आहे जे व्यक्तीच्या भविष्यातील घटना अचूक सांगते त्यामुळे ज्योतिष व अध्यात्म मानवाला नव संजीवनी देऊ शकतात असे ठोस प्रतिपादन संजीवनी ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे यांनी पदवीदान समारंभात व्यक्त केले. सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसाद मंडळ संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आयोजित अठराव्या पदवीदान समारंभ व ज्योतिष व्याख्यानमाला या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक प्रभावळकर संपादक दैनिक तरुण भारत तर अध्यक्ष म्हणून कुलगुरू वेदमूर्ती मोहन पूर्णपात्रे उपस्थित होते याशिवाय गुरु श्री प्रिया मालवणकर, डिजिटल मीडियाचे संपादक प्रल्हाद चव्हाण, संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वर्षापासून देण्यात येणारा संजीवनी कार्य गौरव पुरस्कार मायणी येथील पत्रकार श्री दिलीप पुस्तके तसेच ज्येष्ठविधीज्ञ सौ रजनी गाडे व सातारा येथील महिला उद्योजिका सौ विद्या कासकर यांना देण्यात आला. प्रथम सत्राच्या व्याख्यानमालेत श्री मनोज देशपांडे, अंकशास्त्र, सौ सुनीता साने ,टॅरो कार्ड तर प्रिया मालवणकर यांनी दत्त उपासना व उपाय या विषयावर व्याख्याने देऊन उपस्थित त्यांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्योतिष अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 66 विद्यार्थ्यांना ज्योतिष विशारद, भास्कर या पदव्या देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे प्राध्यापक दिलीप पुस्तके यांना ज्योतिर्विद्या वाचस्पती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून असंख्य ज्योतिष प्रेमी, हितचिंतक, वकील डॉक्टर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सौ सोनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.