ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

अहमदनगर:-आघाडीच्या नेत्यांकडे वैचारिकता नाही, जिल्ह्यासाठी यांचे योगदान काय ! – खा.डॉ.सुजय विखे.

प्रतिनिधी अतुल भापकर अहमदनगर:-9607009988

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अतुल भापकर अहमदनगर

आघाडीच्या नेत्यांकडे वैचारिकता नाही, जिल्ह्यासाठी यांचे योगदान काय ! – खा.डॉ.सुजय विखे.
गाडेंचे जनतेने तीन वेळा डिपॉजिट घातले – माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले…
नगर बाजार समितीने दुष्काळात पशुधन वाचवले – आमदार बबनराव पाचपुते…
भाजपचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न…

अहमदनगर :- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक भाजपचा भव्य कार्यकर्ता मेळावा निशा लॉन्स येथे संपन्न झाला,यावेळी नेत्यांनी आघाडीचा जोरदार समाचार घेतलात,जिल्ह्याचे विचारवंत लोक काल आघाडीच्या मेळाव्यास होते,यांची वैचारिकता काय आहे, जिल्ह्यासाठी हे काय करणार अस कोणीही बोलल नाही,आम्ही ही योजना सामान्य व्यक्तींसाठी केली अस कोणीही बोललं नाही,२.५ कोटी रुपयांचा रस्ता पुणे हायवे वरून बाजार समितीकडे जाण्यासाठी मंजूर केला,नगरची बाजार समिती राज्यात मोठी आणि प्रगतशील बाजार समिती आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची जाणीव असावी लागते,आम्हाला आज सत्ता मिळाली नाही,काही नेते काल आले आणि विकासाच्या गप्पा करायला लागले अशी टीका विखे यांनी लंकेंवर केली,नगर जिल्ह्यासाठी कांदा रेल्वे सुरु करण्याची भाषा विखे यांनी केल्याने सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला,सुजय विखे बोलून नाही गप्प राहून पराभव दाखवणारा व्यक्ती आहे असे विखे म्हणाले, वाळूचे हप्ते बंद केल्याने यांची अक्कल बंद झाली,यांचे उलटे उद्योग बंद झाले,गुन्हेगारी प्रवृत्ती बंद झाली यामुळे ही लोक एक झाली यावर विखे यांनी प्रभावी भाषण केलं, जिल्ह्यात सगळे गुन्हेगारी उद्योग करण्याचे काम आघाडीचे नेते करतात त्यांचा वेळीच बंदोबस्त केला जाईल,यासाठी सरकारी यंत्रणा काम करण्यास सज्ज आहे, विखे पाटील इतके प्रभावी बोलत होते की सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या,मुलांच्या विकासासाठी,मुलांच्या आयुष्यासाठी आघाडीचे कोणी नेते बोलले का ! चुकीचे लोक मोठी करु नका,चुकीच्या लोकांना प्रसिध्दी देऊ नका यावर विखे यांनी चांगलीच तोफ डागली,आपल्या मुलांना विचारा तुम्हाला खासदार कोण पाहिजे ! सर्व जण उत्तर देतील डॉ.सुजय विखे असे बोलून त्यांनी पुन्हा खासदार होण्याचे बोलून दाखवले,
आघाडीची भाषण जर ऐकली तर बालिशपणाचे लक्षण, शेतकऱ्यांसाठी काय करणार,विकासाचा मुद्दा काय यावर त्यांना काही सुचले नाही,सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केलं नसत तर बाजार समितीची सत्ता मागेच गेली असती,बाजार समितीत खरे योगदान माजी सभापती भानुदास कोतकर यांचे आहे त्यांनी बाजार समितीला वैभव प्राप्त करुन दिले, विकासाचे काम झाले तर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे हा आघाडीचा धंदा आहे,बाजार समितीने तालुक्यात पाच ठिकाणी कोरोना सेंटर चालवले,तुमची राज्यात सत्ता होती तुम्ही साधा बोर तरी तालुक्यात घेतला का असा समाचार कर्डिले यांनी घेतला,गाय,म्हैस यांच्या समस्या मला माहिती आहेत,तुम्हाला धार मागून काढतात की पुढून काढतात हे माहिती आहे का असे गाडे यांचे नाव न घेता टिका केली,टक्केवारी घेऊन आघाडीने काम केले, जनतेचे पैसे खाणारी मंडळी जिल्हा परिषद सोडत नाहीत हे फक्त टक्केवारी साठी,तीन वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी एक वर्षात आणला असेही कर्डिले म्हणाले, भाजपमध्ये टक्केवारी काम चालत नाही ते उद्योग आघाडीचे यावर कर्डिले यांनी चांगलाच समाचार घेतला, जनतेच रक्त पेण्याचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून तुम्ही मंडळींनी केलं आणि आमच्या वर आरोप करून प्रसिध्दी मिळवायची हे उद्योग गाडेंनी कायम केले,बाजार समिती वाचवायला निघालेले कारखाना खाऊन बसले आणि शेतकऱ्यांची कळवळ्याची भाषा करता,मतदार तुमचा हिशोब नक्कीच चुकता करतील ही येणाऱ्या निवडणूकीत समजेल,दूध संघाचा सगळा कारभार तुमच्या नेत्याच्या ताब्यात होता हे नगर तालुक्याला माहिती आहे अशा सर्व प्रश्नाची उत्तरे कर्डिले आघाडीवर तोफ डागली, पारनेरच्या नेत्याच्या ताब्यात दूध संघ गेला आहे,त्यांनी पहावा दूध संघाचे काय झाले , तुम्हाला आमदार होता आलं नाही तुमच डिपॉजिट करून जनतेने तुम्हाला बाहेर काढल हा अपमान गाडेंना सहन झाला नाही,शिवाजी महाराजांच नाव राहुरी कारखान्याला दिल होत ते काढून आजोबांचे नाव दिलं इतकी स्वार्थी मंडळी असल्याचे कर्डिले यांनी सांगून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका केली, आघाडीच्या उमेदवारांना दोन अंकी संख्या गाठू देणार नाही, आजची उपस्थिती हाच आपला निकाल असेही कर्डीले म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलाला बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्याचा विचार करतो आहोत त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन घेऊ असे कर्डीले म्हणाले,अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले येणाऱ्या काळात कुठ असतील,त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहू नये अशी टीका घनश्याम शेलार यांचे नाव न घेता केली,नगर बाजार समितीने दुष्काळाच्या काळात पशुधन वाचवले व राज्यातील नावलौकिक कायम टिकवून ठेवला म्हणून बाजार समिती पुन्हा कर्डीले व भाजपच्या ताब्यात देण्याचे आवाहन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले….
युवा नेते अक्षय कर्डिले,दिलीप भालसिंग,अभिलाष पाटील घिगे,रमेश भांबरे,दादाभाऊ चितळकर,दत्ता पाटील नारळे,अशोक कोकाटे,अनिल करांडे यांची भाषणे झाली,अनिल करांडे यांनी रघुनाथ झिने,संदेश कार्ले,बाळासाहेब हराळ यांचा चांगलाच समाचार घेतला,अभिलाष पाटील यांनी शशीकांत गाडे यांची पात्रता काय ! तुम्हाला अजून गुलाल घेता आला नाही अशी बोचरी टीका केली,यावेळी अशोक झरेकर, राम पानमळकर, राम साबळे, संतोष म्हस्के,रेवण चोभे,विलास शिंदे, आनंदराव शेळके,बाजीराव गवारे,मनोज कोकाटे,भाऊसाहेब बोठे,अर्चना चौधरी तसेच नगर तालुक्यातील भाजपचे सेवा सोसायटी,ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते,यावेळी सुंदर जेवण व स्वादिष्ट आमरसाने कार्यकर्ते तृप्त झाले..

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button