सातारा:-ग्रामीण भागातील गरिबांच्या प्राथमिक शाळा ‘ समूह शाळा ‘ करण्याचे शिल्पकार भाजपच,,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
ग्रामीण भागातील गरिबांच्या प्राथमिक शाळा ‘ समूह शाळा ‘ करण्याचे शिल्पकार भाजपच,,,,,
सातारा दि: जमीन एकीकरण योजना म्हणजे जमिनीचे तुकडे एकत्र करून अधिक जमीन शेतकऱ्यांना देण्याची काँग्रेस काळात योजना आणली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने इतर राजकीय पक्षातील वजनदार नेते व आमदार फोडून आपले संख्याबळ वाढवले होते. तोच भाजप पक्ष सध्या सत्तेत असून ग्रामीण भागातील गरिबांच्या प्राथमिक शाळा बंद करून समूह शाळा करण्याचा निर्णय घेण्याची घाई करीत असल्याचा आरोप विरोधक करू लागले आहेत .या निर्णयाचे शिल्पकार खऱ्या अर्थाने भाजप असल्याचा दावा ग्रामीण भागातील शिक्षण तज्ञ अजित निकम व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते नरेश देसाई यांनी केला आहे.
याबाबत माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जरी विश्वगुरू असले तरी मणिपूर सारखी बुडाला लागलेली आग ती विजू शकले नाहीत. महागाई, कंत्राटीकरण व दलित ,अल्पसंख्याकांवर अन्याय आणि मराठा व धनगर समाजाला हक्काचे आरक्षण न देता त्यांना झुलवत ठेवण्याचे काम भाजपमधील चाणक्य हुशारीने करत आहेत. त्यांनी नेमलेले सुभेदार हीच री ओढताना दिसत आहे .त्यामुळे आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सत्तेपासून घर वापसीचा महाराष्ट्राचा निर्णय झाला असून भारतीय जनता पक्ष महाविजय २०२४ लोकसभा प्रवास या नावाखाली आता ””’ गिरेगा तो ही टांग उपर”” अशी योजना राबवत आहे. अशी टीका होऊ लागली आहे.
भारतीय जनता पक्षाने जुमलेबाजी कडून ९ वर्षापूर्वी सत्ता स्थापन केली होती .त्यानंतर ज्या पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याच पक्षातील अनेक मान्यवर नेते व त्यांचे नातेवाईक यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे. परंतु, वाण नाही पण गुण लागतो. तशा पद्धतीने आता या जुमलेबाज भाजपचीच ””””’ खोटे बोला पण, रेटून बोला”””””””” ही शिकवण आता पूर्वाश्रमीचे खासदार व आमदार आणि कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यानंतर मिळाली आहे.
द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कडू कसा झाला तर संगत नडली. अशा पद्धतीने त्याचे विश्लेषण केले जात आहे. महाराष्ट्र मध्ये मोठा जनाधार मराठा , धनगर व इतर मागासवर्गीय जातीचा आहे. मागासवर्गीय अल्पसंख्याक भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी यांची ही लक्षणीय संख्या आहे. परंतु आतापर्यंत जनगणना झालेली नाही. ज्या बिहार राज्याला मागास राज्य म्हणून संपूर्ण देश ओळखत होता .त्या ठिकाणी मोठ्या गतीने जात निहाय जनगणना करून खऱ्या अर्थाने सर्व जातीला न्याय देण्याची भूमिका नितेश कुमार यांनी घेतलेली आहे .पण, ट्रिपल इंजिन राज्य सरकार अजून साधी जनगणनेची डगर चढू शकत नाही. ही शोकांतिका आहे. अशा अनेक समस्या गंभीर बनल्या असूनही पोकळ जय हो चा नारा दिला जात आहे. विकास कामे होत नाहीत. त्यावेळी जुमले बाजी केली जाते.
लोकसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून आज प्रवासी विधायक, लोकसभा प्रवास असा शब्दछल करून मतदारांमध्ये जाण्याचा भाजपचा केविलवाली प्रयत्न सुरू झालेला आहे. रोड शो प्लॉप होत असल्याने आता घरोघरी जाऊन भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. परंतु, महागाई, बेरोजगारी व सिंचन घोटाळा, महिलांवर होणारे अत्याचार, नोटाबंदी जी एस टी, लॉकडाऊन असे नऊ वर्षातील विविध प्रश्नांची मालिका मतदार विचारू लागलेले आहेत. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या विरोधात बातम्या येऊ नये. यासाठी पत्रकारांना चहापान, धाब्यावर घेऊन जाणे. असा सल्ला देऊन एक पाचवा खांब तयार केलेला आहे. तो आता दिवसाढवळ्या काही ना दारूच्या खंब्यासारख्या दिसू लागलेला आहे. त्याची नशा फार काळ टिकणार नाही. शेवटी सत्य हे सत्य असते.
वास्तविक पाहता निकोप राजकारण करणारी भाजपमध्ये एक पिढी होती. आदर्श व तत्वज्ञान आणि निष्ठा याचं ज्वलंत उदाहरण म्हणून भाजप व त्यांच्या विविध शाखेतील कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक पाहिले जात होते. भाजपचे पाणी स्वच्छ होते पण त्यामध्ये मातीचा खडा टाकून ते सर्व पाणी गडुळ केलेले आहे. अशा पद्धतीने त्याचे विश्लेषण केले जात आहे. हे आता भाजपच्या निष्ठावंतांनी गांभीर्याने समजून घेतले पाहिजे. मालक असूनही काहींना सेवक बनून पक्षाचे काम करावे लागत आहे .
सातारा जिल्हा क्रांतीकारकांचा जिल्हा आहे. या ठिकाणी पेरल ते उगवते असं काही होत नाही. तर बियाणे चांगले असेल तर शेतकरी आपण मशागत केलेल्या रानात ते बी लावतात अन्यथा हेच बी अतिवृष्टी मध्ये कुजून जाते तर दुष्काळामध्ये वाळून जाते. असाच काहीसा प्रकार आता दिसू लागलेले आहे. भाजपचा घटक पक्ष असलेल्या सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भाजपने घेतलेल्या समूह प्राथमिक शाळा निर्णयाची चांगलीच खिल्ली उडवली असून आपल्या सोबत असणारा घटक पक्ष जेव्हा रस्त्यावर आंदोलन करतो. त्यावेळेला हातच्या कंकणाला आरसा कशाला ? असे त्याचे वर्णन केले जाते.
सातारा जिल्ह्याचा विचार केला तर साताऱ्यातील सुशिक्षित व शिक्षण पूर्ण झालेली एक पिढी आता नोकरी व्यवसायासाठी पुणे, मुंबई ,ठाणे, नाशिक, नगर एवढेच नव्हे तर काहीजण परदेशात सुद्धा जाऊ लागलेले आहेत. पूर्वी सातारा शहर हे पेन्शनरचे शहर म्हणून ओळखले जात होते.पण, आता सातारा शहर हे बेरोजगार व गुन्हेगारीचे केंद्र बनलेले आहे. याची चिंता पालक वर्गाला मोठ्या प्रमाणात आहे.
राज्यात राजकीय पटलावर पॅकिंग बदलले पण माल तोच असल्याने मतदारांचा नेत्यांवरील राजकीय विश्वास उडालेला आहे. जातीय द्वेष पसरवणे याची चुणूक पुसे सावळी येथे नुकतीच दिसून आली. आजही एक युवा पिढी कायद्याच्या कचाट्यात सापडलेली आहे. पण त्यांच्याकडे लक्ष देण्यास कट्टर हिंदुत्ववादी समजणाऱ्यांना वेळ नाही. निवडणुका झाल्या तर आपले काही खरं नाही. याची खात्री पटल्यामुळेच भाजप सर्व निवडणुका पुढे ढकलत आहेत.
खऱ्या अर्थाने आज भाजपचा मुखवट्या मागील चेहरा लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून चारा छावणीची मागणी होऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त सातारा जिल्ह्यात सुमारे एक हजार मेट्रिक टन कचरा गोळा झाला. त्याला प्रसिद्धी मिळाली मग यापूर्वी घंटागाडी व स्वच्छता मोहीम राबवली.त्याला निधी खर्च केला. त्याची चौकशी कोण करणार ? असे अनेक प्रश्न आता भाजपच्या यात्रा अडवण्यास कारणीभूत ठरलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील औद्योगीकरण ठप्प झाले असून त्यांना देण्यासाठी आता पाणी शिल्लक नाही .असं अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी सांगितले. आता तर पिण्याच्या पाण्याच्या नियोजनामधील पाणी काही गावांना देण्याचा निर्णय झाल्याचे सांगून आनंद उत्सव साजरा केला जात आहे. पण आता गाळ सुद्धा शिल्लक नाही. त्यामुळे भाजप बद्दल असलेली नाराजी भाजपच्या विविध कार्यक्रमामुळे लोकांच्या समोर येऊ लागलेली आहे. हे मात्र खरे,,,
———————–&—————–
चौकट ——दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यानंतर अनेक ठिकाणी महापुरात नुकसान होते. आता धरण भरले जाते पण, आजूबाजूची माती सुद्धा च्या धरणात जाऊन मोठ्या प्रमाणात गाळ साचला जातो. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा टी एम सी साठा हा कमी असून त्याचीही तपासणी करूनच अतिरिक्त पाणी नियोजन करावे. अशी मागणी पुढे आलेले आहे. याचा अभ्यास भाजपच्या तज्ञ मंडळींनी करून लोकांची दिशाभूल थांबवावी यासाठी आता ग्रामीण भागात पत्रकार परिषद घेऊन काम बंद पाडत आहे. हे सुद्धा समोर आलेला आहे.
———————————————-
फोटो –