मावळ:-पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली.
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार धर्मेंद्र ठाकर मावळ
पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली.
धरणग्रस्तांच्या आंदोलनाला यश लवकरच प्रत्येकी 4 एकर जमीन मिळणार.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज ( दि 19) रोजी बैठक संपन्न झाली.
आज झालेल्या बैठकीत पवना धरणग्रस्तांना पवना धरण परिसरात दोन एकर व जिल्ह्यात जिथे सरकारी जमीन शिल्लक असेल तिथे दोन एकर अशी एकूण ४ एकर जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविण्याचे आदेश मा.पालकमंत्र्यांनी आज दिले.
पवना धरण प्रकल्पातील ३४० बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु उर्वरित अनेक खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते.या संदर्भात मागील चार वर्षांपासून मंत्रालय स्तरावर अनेकदा विभागनिहाय बैठका घेत पाठपुरावा केला होता.तसेच विधानसभेत देखील याविषयी आवाज उठविला होता. मंगळवार दि.९ मे २०२३ रोजी सर्व शेतकऱ्यांनी पवना धरणाचे पाणी रोखून एकदिवसीय आंदोलन केले होते.या आंदोलनादरम्यान लवकरच बैठक घेऊन धरणग्रस्तांना न्याय देऊ,असा शब्द प्रशासनाकडून मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे समाधान आहे.
पालकमंत्री मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचे मावळच्या शेतकऱ्यांच्या वतीने विशेष आभार!
याबैठकीस खासदार श्री.श्रीरंगआप्पा बारणे, मा.राज्यमंत्री श्री.संजय (बाळा) भेगडे, जिल्हाधिकारी श्री.राजेशजी देशमुख, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सौ.गितांजली शिर्के, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.अजय मोरे, अधिक्षक अभियंता सौ.जगताप, पिंपरी चिंचवड आयुक्त श्री.शेखर सिंह, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता श्री.विजय पाटील, उपअभियंता श्री.अशोक शेटे, शाखा अभियंता श्री.अहिरे, उपविभागीय अधिकारी मावळ श्री.बागडे, तहसीलदार श्री.विक्रम देशमुख, पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.