अनाधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी जावळी तहसीलदार यांनी केलेला २९,लक्ष ४८ हजार,६८२ रुपये दंड उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केला कायम.
प्रतिनिधी :- राजेंद्र काळे सातारा

अनाधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी जावळी तहसीलदार यांनी केलेला २९,लक्ष ४८ हजार,६८२ रुपये दंड उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केला कायम.
याबाबत अधिक माहिती अशी मौजे रुईघर तालुका जावळी येथील गट नंबर ३९२ मध्ये जयवंत विठ्ठल कुदळे यांनी भोगवटा वर्ग २ जमिनी मध्ये अनाधिकृत उत्खनन केले असल्याबाबत तक्रार श्री आकाश बाजीराव रांजणे यांनी तत्कालीन तहसीलदार रणजित देसाई यांच्या कडे केलेली होती परंतु संबधित तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई न केल्याने तक्रारदार यांनी फेरपंचनामा करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली त्यानुसार संबधित जागेचा फेर पंचनामा करण्यात आला. व संबधित जागा मालक यांना ५२ लाख दंड करण्यात आला होता त्यावर आपिलाची २५ टक्के रक्कम जागा मालक यांनी शासन जमा केली होती.व उर्वरित रक्कम माफ करून मिळण्याबाबत अपील दाखल केले होते. त्यानुसार फेरपंचनामा होऊन २९,लक्ष ४८ हजार,६८२ रुपये दंड तहसिलदार यांनी जागा मालक यांना शासनास जमा करण्याचे आदेश दिले होते.त्यावर जागा मालक यांनी पुन्हा अपील दाखल केले त्यावर प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दंडाची रक्कम कायम करत शासनास जमा करण्याचे आदेश जयवंत विठ्ठल कुदळे यांना केले.