ताज्या घडामोडी

सातारा:-सत्ताधाऱ्यांच्या षडयंत्रणामध्ये बहुजनांनी अडकून पडू नये-अजिंक्य चांदणे.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सत्ताधाऱ्यांच्या षडयंत्रणामध्ये बहुजनांनी अडकून पडू नये-अजिंक्य चांदणे.

सातारा दि: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. धर्म सत्ता राज्य सत्ता त्यांच्या ताब्यात असूनही जातीयवादी यांची ओरिजिनल लढाई युगपुरुषांच्या विचारधारे सोबत आहे. त्यामुळे बहुजन समाजाने षडयंत्रणेच्या जाळ्यात अडकून पडू नये असे आवाहन डोमेक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी सातारा येथे केले.
साताऱ्यातील पुरोगामी चळवळीच्या अनुषंगाने आयोजित पुरोगामी विचार परिषद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळेला ज्येष्ठ विचारवंत उद्घाघाटक माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. शरद गायकवाड, डी पी आय सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश तथा रावण गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फुले- शाहू – आंबेडकर विचारांचा पगडा जतन करण्याचे काम आपण करतच राहणार आहे .आज जातीयवादी पक्षाकडून युगपुरुषांचा अवमान करून दंगल घडवली जाते. त्यानंतर प्रतिक्रिया उमटल्यावर आपल्याच कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करून अडकवली जात आहे. हा आणीबाणीचा काळ असून या काळामध्ये जे लढतील त्यांची इतिहासात नोंद होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक सुकुमार कांबळे म्हणाले युगपुरुषांच्या विचाराची शिदोरी आपल्याला मिळाल्यामुळेच आपणच फक्त म्हणजे बहुजन समाज युगपुरुषांची जयंती साजरी करतो. मनुस्मृतीच्या आधारे हिंदुराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा वेळेला भगवान गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करूनच ही लढाई जिंकावी लागणार आहे. आज ज्या व्यवस्थेने बहुजन समाजाला नाकारले आहे. त्यांच्याच हातात सत्ता देण्यासाठी काही बहुजन कारणीभूत ठरलेले आहेत याचे भान आता सर्वांनीच ठेवले पाहिजे.
. प्रा. गायकवाड म्हणाले, अंधश्रद्धा नष्ट करून मातंग समाजाने बुद्ध विचाराची कास पकडली पाहिजे. बुद्ध विहारच्या ऐवजी बिहार जरी केले असल्याने लोकशाही कोमात आहे. युगपुरुषांच्या विचारधारेनुसारच प्रगती होणार आहे. धर्म जात ही जगण्यासाठी उपयुक्त नाही. युगपुरुषांचे विचारच आपल्याला महत्त्वाचे आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी सोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख व रतनलाल सोनाग्रह यांच्या सहवास लाभलेल्या माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी उमेदीच्या काळातील चळवळीतील योगदान सांगितले. शाळेच्या पडवीत थांबून चळवळीत काम करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावाला राहिली या गीतांवर चर्चा घडवून आणून आम्ही वास्तवता जगत होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला अनेक युगपुरुषांचे योगदान आहे परंतु त्यांचे स्वप्न साकार होऊ शकले नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केली.
साताऱ्यातील छत्रपती प्रताप सिंह हायस्कूल येथे झालेल्या या पुरोगामी विचारधाराची उजळणी झाली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन घाडगे, पुंडलिक पाटोळे, मनोज कुमार तपासे, शाहीर श्रीरंग रणदिवे, विलास कांबळे, रामदास भंडारे, सुरेश आवळे, दिनकर पाटील, आबा माने, शाहीर भानुदास गायकवाड ,सरिता आवळे, मीना साठे, संगीता गायकवाड, दिलीप भोसले ,अनिल वीर, उमेश खंडझोडे, हृदयनाथ गायकवाड मंजुश्री जावळे मंगेश आवळे, ऋषी वायदंडे, अमोल पाटोळे, अरुण जावळे, मच्छिंद्र जाधव, अर्चना चव्हाण, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने पुरोगामी चळवळीची ज्योत तेवत राहणार आहे याचा अनुभव आला. या पुरोगामी चळवळीच्या कार्यक्रमाला प्रकाश काशिळकर व अमर गायकवाड यांनी प्रस्तावित केले तर रियाज बागवान यांनी आभार मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button