दहिवडी:-द्वेष भावनेतून ॲट्रॉसिटी ॲक्ट गैर वापर करणाऱ्यांवर कारवाईची पी आर पी ची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारमांतर्गत दिल्ली नोंदणीकृत )
द्वेष भावनेतून ॲट्रॉसिटी ॲक्ट गैर वापर करणाऱ्यांवर कारवाईची पी आर पी ची मागणी.
दहिवडी दि:
महाराष्ट्रातील दलित- पददलित- शोषित- वंचित- कष्टकरी अशा ५९ जातींवर जातीय भावनेतून कुणीही अन्याय करू नये. यासाठी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा करण्यात आला. या कायद्यामुळे जातीयवाद संपुष्टात येऊन समतेचा व विश्वासाचा नारा दिला जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, आपल्या राजकीय व इतर कारणाने या कायद्याचा सरास वापर केला जात आहे. मुळातच ५९ जाती पैकी किमान ५० जातींनी कधीही अशा कायद्याची अंमलबजावणी किंवा वापर केलेला नाही. याचे कारण काही ही असले तरी विशिष्ट जाती या कायद्याचा गैरवापर करून दुसऱ्याच्या हातचे बाहुली बनत आहे. त्यामुळे इतर जातींना या जातीतील लोकांबद्दल तिरस्कार वाटतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही ॲट्रॉसिटी बाबत एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यात
पत्रकारितेच्या माध्यमातून सूड उगवण्यासाठी काही जण बरेच प्रयत्नात होते. आता ॲट्रॉसिटी ॲक्ट ( अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा )एका पत्रकाराबद्दल लागू करून काय साध्य केले ? या कायद्याचा उघडपणाने गैरवापर केल्याची न्यायव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या तज्ञ मंडळींना सुद्धा शंका वाटू लागलेली आहे. सातारा जिल्ह्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यासाठी १०० पेक्षा जास्त प्रकरण सध्या प्रलंबित आहेत.
याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खात्याबद्दल आमचं काही म्हणणे नाही. परंतु, आता सातारा जिल्ह्यातच काही बातम्या प्रसिद्ध झाल्या तर भविष्यात ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती वाढल्यास नवल वाटणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट साठी जातीचा आधार घेणारे काही तथाकथित नेतेगण नंतर तक्रारदारांना त्यांना महत्त्वाच्या पदावर का घेत नाहीत ?असे आमचा सवाल आहे.
दलित कष्टकरी शोषित वंचित असणाऱ्यांना प्रस्थापितांपासून संरक्षण मिळावे म्हणून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा करण्यात आला. दुर्दैवाने आज या कायद्याची कडक अंमलबजावणी काही ठिकाणी होत नाही. पण, काही ठिकाणी अगदी डोळ्यात तेल घालून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ज्या प्रवृत्तीने पुढाकार घेतला आहे .त्या प्रवृत्ती बद्दल लवकरच जाब विचारू आंदोलन केले जाईल. २०२४ साली शिवीगाळ केल्याप्रकरणी खटाव तालुक्यात गुन्हा दाखल होत आहे. त्यानंतर एक वर्षाने कारवाई केली जाते .हीच मोठी शरमेची बाब आहे. लय भारी यू ट्यूब वहिनीचे पत्रकार तुषार खरात यांच्या बद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मत्सर, लोभ असं काही नाही. त्यांनी बातमीच्या माध्यमातून अतिरेक केलेला आहे. असे आमचे ठाम मत आहे. पण त्या बिचारावर अन्याय झाला की त्याने केलेल्या कृत्यामुळे इतरांना न्याय मिळाला ? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवला जाईल. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश गायकवाड व गणेश वाघमारे यांनी दिलेले आहे. त्याला आमचा पाठिंबा असून म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये .म्हणून या सर्व प्रकरणाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करावी. अशी आम्ही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे रक्षक म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने मागणी करत आहोत.
सदर निवेदनाच्या प्रती माहितीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना सादर केले आहेत. जर सातारा जिल्ह्यात लोकशाही टिकवायचे असेल तर ॲट्रॉसिटी ॲक्ट चा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात सर्व स्तरातील लोकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. भविष्यात याबाबत चिकित्सा केली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनावर विशाल भोसले ऋषिकेश गायकवाड व गणेश वाघमारे यांच्यासह आहेत.
आपला नम्र
विशाल भोसले
पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सातारा मोबाईल नंबर ८६०५३ ७०५७७